शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रातच प्रस्तावांची पडताळणी

By admin | Updated: April 25, 2017 01:46 IST

दुर्धर आजारी रुग्णांच्या औषधोपचारासाठी अर्थसहाय्य : जिल्हा स्तरावर होणारी पायपीट थांबणार!

वाशिम: दुर्धर आजारी रुग्णांना औषधोपचारासाठी मिळणाऱ्या अर्थसहाय्यासाठी आता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातच प्रस्ताव सादर करता येणार आहे. यापूर्वी प्रस्ताव स्वीकारण्यापासून ते पडताळणीपर्यंतची संपूर्ण कार्यवाही जिल्हा परिषदेत होत होती. प्राथमिक आरोग्य केंद्रातच प्रस्तावांची संपूर्ण कार्यवाही करणारी वाशिम जिल्हा परिषद ही अमरावती विभागात पहिली ठरल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.नानाविध कारणांमुळे मानवाला विविध प्रकारचे दुर्धर आजार जडत आहेत. गोरगरीब रुग्णांना कर्करोग, हृदयरोग, किडनी निकामी होणे आदी यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचाराचा खर्च झेपावणारा नसल्याने शासनाने सरकारी दवाखान्यांची सुविधा उपलब्ध केली. याबरोबरच गोरगरीब रुग्णांना औषधोपचारासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून १५ हजारांचे आर्थिक साहाय्यदेखील दिले जाते. राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या खासगी रुग्णालयात तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतलेल्या कर्करोग, हृदयरोग व किडनी निकामीग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. यापूर्वी सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी रुग्णांना जिल्हा परिषदेत चकरा माराव्या लागत होत्या. प्रस्ताव सादर करणे आणि त्रुटी असल्यास त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णांना ‘वाशिम’ची वारी करावी लागत असल्याने यामध्ये वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही प्रश्न उपस्थित झाले. रुग्णांची जिल्हावारी थांबविण्यासाठी आणि प्रस्तावांच्या संपूर्ण कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी मार्च महिन्यात जिल्हा परिषद प्रशासन व आरोग्य विभागाने चाचपणी सुरू केली. यानुसार एप्रिल महिन्यापासून संपूर्ण प्रस्तावाची कार्यवाही संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्याचा ठोस निर्णय घेतला. या निर्णयाची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. दुर्धर आजारी रुग्णांना आता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातच प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. अपूर्ण प्रस्ताव तसेच प्रस्तावात त्रुटी असतील, तर या त्रुटींची पूर्ततादेखील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरच करावी लागणार आहे. त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर केले जातील. येथे जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट लाभार्थींना दिले जाणार आहे.