शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिम जिल्ह्यात पोषण महिना उपक्रमास प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 14:26 IST

जिल्हाभरात आशा सेविकांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीस सुरूवात झाली असून ५ महत्वाच्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतिने राबविण्यात येणाऱ्या राष्टÑीय पोषण महिना उपक्रमास १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात प्रारंभ झाला. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाºया या उपक्रमांतर्गत पहिल्याच दिवसापासून जिल्हाभरात आशा सेविकांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीस सुरूवात झाली असून ५ महत्वाच्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.यासंदर्भात माहिती देताना महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले, की पोषण अभियानाच्या माध्यमातून नवजात बालकाच्या पहिल्या हजार दिवसात त्याचे पोषण व्यवस्थितरित्या होणे, अ‍ॅनेमिया, अतिसार या आजारांवर नियंत्रण मिळविणे, हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छतेवर भर, पौष्टीक आहार यासारख्या ५ महत्वपूर्ण घटकांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासंबंधी लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता आशा सेविकांची मदत घेतली जात असून शहरी भागातील झोपडपट्टीतील लोकसंख्या व स्थलांतरीत नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह पोषण सेवेचा लाभ देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.पोषण आहार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, ग्राम विकास, नगर विकास, कृषी, कौशल्य विकास, क्रिडा, माहिती व जनसंपर्क, समाज कल्याण आदी विभागांचा सहभाग घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवातील देखाव्यांमध्ये जनजागृतीपर बॅनर्स लावणे, ३ सप्टेंबरला बालकांचे लसीकरण, ४ सप्टेंबरला पौष्टीक आहारांसबंधी जागर करण्यासाठी प्रभात फेरी, ५ सप्टेंबरला कुपोषित बालकांच्या घरी भेटी देणे, ६ सप्टेंबरला आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अ‍ॅनेमिया प्रतिबंधासाठी आरोग्य शिबिर, ७ सप्टेंबरला नाटिका, पथनाट्याच्या माध्यमातून पोषण आहारासंबंधी जनजागृती करणे, ९ सप्टेंबरला वैयक्तिक स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली, ११ सप्टेंबरला परसबागेबद्दल जनजागृती करणे, १३ सप्टेंबरला लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पोषण चौपालचे आयोजन करून परिसर स्वच्छता, स्वच्छतागृहांचा वापर, आहाराचे महत्व आणि उपलब्धता आदिंबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे.यासह १४ ते २१ सप्टेंबर या कालावधीत शाळांमध्ये पोषण प्रश्नोत्तरी, पोषणविषयक वादविवाद स्पर्धा घेतली जाणार आहे. तसेच २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत बचतगटांच्या बैठका घेऊन अ‍ॅनिमिया, योग्य आहार सवयी, वैयक्तिक परिसर स्वच्छता याबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती सुभाष राठोड यांनी दिली.

‘डायलर टोन’च्या माध्यमातून जनजागृतीकुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने हाती घेतलेल्या पोषण महिना उपक्रमाची स्थानिक स्तरावर प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान, या उपक्रमासंबंधी तयार करण्यात आलेली ‘डायलर टोन’ महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी जिल्हाभरातील आशा सेविकांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅक्टिव्हेट करून दिली. आशा सेविकांच्या मोबाईलवर फोन करणाऱ्यांमध्ये यामुळे आपसूकच जनजागृती होत असल्याचे राठोड यांनी सांगतले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद