शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

वाकाटकांची राजधानी धुळीने माखली

By admin | Updated: December 8, 2014 01:37 IST

उपाययोजनांची वानवा : प्रदूषण धोकादायक पातळीच्या पुढे, शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात.

वाशिम : राजे वाकाटकांची राजधानी म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेली वाशिम नगरी आजमितीला पुरती भकास झाली आहे. वाढते प्रदूषण व धूलिकणांच्या वाढलेल्या प्रमाणाने यामध्ये अधिकच भर घातली आहे. घरात, कार्यालयांत आणि इतर मानवी वसाहतींत आढळणार्‍या धुळीत मानव आणि प्राण्यांचे केस, कपड्यांचे धागे, कागदाचे कण, शहरात सुरू असलेली बांधकाम, बाहेरच्या मातीतील क्षार आणि स्थानिक पर्यावरणात आढळणारे घटक अशा एक ना अनेक घटकांनी धुराचे लोट निर्माण होत आहेत. यातूनच मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.गेल्या दशकभरात शहरात जल आणि ध्वनी प्रदूषणाबरोबर वायुप्रदूषणाने कमालीची पातळी गाठली आहे. विशेषत: शहरात सुरू असणारी बांधकामे, उखळलेले रस्ते वायुप्रदुषणास कारणीभूत आहेत; शिवाय या धूळधाणीत सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइडसह प्रदूषकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबधित कार्यालयात झालेली आहे. गत वर्षभरापासून नगरपालिकेने भुयारी गटार योजना व अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतलेले आहे. या कामासाठी शहरातील रस्त्याची चाळण करण्यात आलेली आहे. यातूनच धुळीचे साम्रज्य वाढले असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे खोदून ठेवलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी पालिकेकडे कुठलीच तजवीज नाही. त्यामुळे शहरात धुळीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. धुळीमुळे शहरात श्‍वसनाच्या आजारातही वाढ झालेली आहे. विशेष करून लहान मुले व वृद्धांना या आजारांचा विळखा दिसून येत आहे. या धुळीतूनच सोडियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशिएम, ब्रोमाइड व मॅग्नेशिएम क्लोराइड पसरतात. धूलिकण हे वातावरणातील शाश्‍वत घटक नसतात.