शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वाशिम जिल्ह्यातील ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 16:50 IST

वाशिम: अत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण येत्या १ मेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्यांनी मंगळवारी दिली. रस्त्य्यांचे अद्ययावतीकरण करून ...

ठळक मुद्देअत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे.मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण येत्या १ मेपर्यंत करण्यात येणार. या कामाच्या कार्यारंभ आदेशानंतर संबंधित कंत्राटदाराला निर्धारित मुदतीत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

वाशिम: अत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण येत्या १ मेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्यांनी मंगळवारी दिली. 

रस्त्य्यांचे अद्ययावतीकरण करून दळणवळणाच्या समस्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यातच राज्यभरातील हजारो रस्त्यांची गेल्या काही वर्षांत दूरावस्था झालेली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागांकडे शेकडो तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. या पृष्ठभूमीवर राज्यभरातील नादुरुस्त रस्त्यांच्या अद्ययातीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात काही रस्त्यांच्या कामांमा मंजुरी देण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ९ रस्त्यांचा समावेश आहे. प्रत्येकी १० किलोमीटर अंतर मिळून एकूण ९२ किलोमीटर अंतराचे रस्ते या अंतर्गत अद्ययावत करण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरानंतर ही सुरू होणार आहेत. वाशिम जिल्ह्यात मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमध्ये वाशिम मालुक्यातील चिंचखेडा-वारा जहागिर- पार्डी आसरा या रस्त्याचे २८.०० ते ३८.०० हे दहा किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून, अमानी-अटकळी-केकतउमरा या रस्त्यावरील २१.०० ते ३१.४०० किमोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून होणार आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यातील जऊळका-पांगराबंदी या रस्त्यावरील ८.०० ते १८.०० किलोमीटर अंतरांचे काम २ कोटी ९९ लाख ९० हजार रुपये खर्चून होणार आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा-तºहाळा या रस्त्याचे १.५०० ते ११.५०० किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून, धानोरा=आसेगाव कुंभी या रस्त्याचे ०० ते ११.५०० किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून होणार आहे. मानोरा तालुक्यातील मानोराज्ञ्-शेंदुरजना-वाईगौळ  या रस्त्यावरील २५.०० ते ३५.०० किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे  काम ३ कोटी रुपये खर्चून, तर कारंजा तालुक्यातील कामरगाव-वाडेगाव-भामदेवी-धोत्रा या रस्त्यावरील १०.०० ते २०.०० किलोमीटर अंतरापर्यंतचे काम ३ कोटी रुपये खर्चून,  कारंजा-मोखड-कामरगाव या रस्त्यावरील ४.०० ते १४.०० किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे काम ३ कोटी रूपये खर्चून, तसेच कारंजा ते धनज या रस्त्यावरील १२.५०० ते २२.५०० किलोमीटर अंतरापर्यंतचे काम २ कोटी ९९ लाख रुपये खर्चून केले जाणार आहे. या कामाच्या कार्यारंभ आदेशानंतर संबंधित कंत्राटदाराला निर्धारित मुदतीत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारावरच त्याच्या वाढलेल्या खर्चाची जबाबदारी राहणार, असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग