शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान; शेतमाल भिजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:19 IST

बाजार समित्यांमधील शेतमाल भिजल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १३ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील शेतमाल भिजल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दुसरीकडे परराज्य तसेच परजिल्ह्यातून आलेले कामगार, मजूर हे ‘होम क्वारंटीन’ म्हणून अनेक ठिकाणी शेतात राहायला गेले होते; त्यांचीही वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे धांदल उडाली.यावर्षी मार्च तसेच एप्रिल महिन्यातही अवकाळी पाउस व गारपिट झाल्याने फळबागेचे तसेच गहू, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. लॉकडाउन व संचारबंदीमुळे फळबाग उत्पादक शेतकरी अगोदरच अडचणीत असताना अवकाळी पावसाने यामध्ये भर टाकली. १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास वादळवाºयासह अवकाळी पाउस आल्याने बाजार समितीच्या ओट्याखाली ठेवण्यात आलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला. यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाशिम बाजार समितीने भिजलेला शेतमाल १४ मे रोजी मोजून घेतला. परंतू, बाजारभाव काय मिळेल, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या ओट्यावर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जातो. व्यापाºयांचा शेतमाल हटवून तेथे शेतकºयांच्या शेतमाल ठेवण्यात यावा, या मागणीसाठी यापूर्वी विविध शेतकरी संघटना, शेतकरी तसेच राजकीय नेत्यांनीदेखील आंदोलने केली होती. या आंदोलनानंतर काही दिवस ओट्यावरील व्यापाºयांचा शेतमाल हटविला जातो. त्यानंतर जैसे थे परिस्थिती होते. १३ मे रोजी अवकाळी पाऊस झाल्याने बाजार समित्यांच्या ओट्यावर व्यापाºयांचा शेतमाल असल्याने शेतकºयांच्या शेतमाल ओट्याखाली ठेवण्यात आला. पावसामुळे हा शेतमाल भिजल्याने शेतकºयांना नुकसान सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बाजार समिती प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.दरम्यान, वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे, चिखली बु. परिसरात पपईच्या बागेचे अतोनात नुकसान झाले. कार्ली परिसरात आंबे, फळबागेचे नुकसान झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परजिल्हा, परराज्यात कामानिमित्त गेलेले कामगार, मजूर परतले आहेत. गांगलवाडीसह २० ते २५ गावातील शेतशिवारात अनेकांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले. वादळी पावसामुळे या नागरिकांची एकच धांदल उडाली. झोपडीत पाणी शिरल्याने अनेकांनी गैरसोयीचा सामना करावा लागला.

वाशिम येथे भिजलेल्या शेतमालाची मोजणी१३ मे रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीस आले होते. सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे वाशिम बाजार समितीच्या ओट्याखाली असलेला शेतमाल भिजला. यावेळी शेतमाल वाचविण्यासाठी शेतकºयांची एकच धावपळ सुरू होती. परंतू, पावसाचा जोर अधिक असल्याने बºयाच शेतकºयांचा शेतमाल भिजला. हा शेतमाल १४ मे रोजी मोजून घेण्यात आला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे यांनी दिली.सर्वेक्षणाच्या सूचनाअवकाळी पावसामुळे फळबागेचे नुकसान झाल्याने कृषी विभागाने तातडीने शेतात जाऊन सर्वेक्षण करावे, पंचनामे शासनाकडे पाठवावे, अशा सूचना जि.प. कृषी सभापती विजय खानझोडे यांनी १४ मे रोजी दिल्या.

 

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसMarket committee washimबाजार समिती वाशिम