शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

वाशिममध्ये पुन्हा अवकाळी पाऊस; २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By संतोष वानखडे | Updated: May 3, 2023 17:36 IST

मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते.

वाशिम : उन्हाळ्यातही जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीचा मुक्काम वाढला असून, मंगळवारी (दि.२) वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. एका दिवसात २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीनंतरही सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याने पीक नुकसानाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर ६, ८, २५, ३० एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, हळद, भाजीपाला व फळबागेचे नुकसान झाले. मे महिन्यातही अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर सुरूच असून, २ मे रोजी दिवसा वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगावात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर सुमारे एक ते दीड तास अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम तालुक्यात ५७.३० हेक्टरवरील पेरू, भाजीपाला,मुंग,कांदा, ज्वारी पिकाचे,रिसोड तालुक्यात ५८ हेक्टरमधील भाजीपाला व कांदा, मालेगाव तालुक्यात ११.८० हेक्टरमधील मुंग व कांदा, कारंजा तालुक्यात १४०.२० हेक्टरमधील भाजीपाला,मुंग, कांदा,भूईमुग, गहु, ज्वारी,निंबू,केळी,संत्रा,तीळ या शेतपीकाचे नुकसान झाल्याची व मौजे शेवती येथील दोन विहिरी खचल्याची प्राथमिक माहिती आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून, शासनाने वाढीव निकषानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी ३ मे रोजी केली.

टॅग्स :washimवाशिम