शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिममध्ये पुन्हा अवकाळी पाऊस; २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By संतोष वानखडे | Updated: May 3, 2023 17:36 IST

मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते.

वाशिम : उन्हाळ्यातही जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीचा मुक्काम वाढला असून, मंगळवारी (दि.२) वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. एका दिवसात २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीनंतरही सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याने पीक नुकसानाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर ६, ८, २५, ३० एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, हळद, भाजीपाला व फळबागेचे नुकसान झाले. मे महिन्यातही अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर सुरूच असून, २ मे रोजी दिवसा वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगावात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर सुमारे एक ते दीड तास अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम तालुक्यात ५७.३० हेक्टरवरील पेरू, भाजीपाला,मुंग,कांदा, ज्वारी पिकाचे,रिसोड तालुक्यात ५८ हेक्टरमधील भाजीपाला व कांदा, मालेगाव तालुक्यात ११.८० हेक्टरमधील मुंग व कांदा, कारंजा तालुक्यात १४०.२० हेक्टरमधील भाजीपाला,मुंग, कांदा,भूईमुग, गहु, ज्वारी,निंबू,केळी,संत्रा,तीळ या शेतपीकाचे नुकसान झाल्याची व मौजे शेवती येथील दोन विहिरी खचल्याची प्राथमिक माहिती आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून, शासनाने वाढीव निकषानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी ३ मे रोजी केली.

टॅग्स :washimवाशिम