शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी कायमच; कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 17:36 IST

कोरोना संसर्गाच्या दृष्टीने ही बाब निश्चितच घातक आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: प्रशासकीय कार्यालयात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पाचपेक्षा अधिक लोकांना प्रवेशावर बंधने आहेत; परंतु जिल्हाभराचे कामकाज पाहिल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासह जवळपास सर्वच प्रशासकीय कार्यालयात नागरिक मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. त्यात विविध प्रश्न, मागण्या, समस्यांच्या निराकरणासाठी निवेदन देण्याकरीता अनेक जण समुहानेच कार्यालयात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या दृष्टीने ही बाब निश्चितच घातक आहे.देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव होताच शासन, प्रशासन सर्तक झाले. नियंत्रणासाठी २३ मार्चपासून कठोर लॉकडाऊन करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. प्रशासकीय कार्यालयातही नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच यावे, तसेच ई-मेल किंवा स्मार्ट फोनचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. एवढेच काय, तर प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही ५० टक्क्यांवरच आणल्या गेली. अद्यापही यातील बहुतांश नियम कायम आहेत; परंतु त्याची दखल मात्र घेतली जात नाही. प्रशासकीय कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत आहे. कार्यालयाच्या कोणत्याही कक्षात पाचपेक्षा अधिक लोकांवर प्रवेश मनाई आहे; परंतु विविध कामांसह मागण्या, समस्या, तक्रारींचे निवेदन देण्यासाठी लोक समुहानेच प्रवेश करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणाचे प्रयत्नही प्रशासकीय अधिकाºयांकडून केले जात नाहीत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याWashim ZPवाशीम जिल्हा परिषद