शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वाशिम तालुक्यातील दोन सरपंच, उपसरपंच अपात्र! उकळीपेन, गोेंडेगाव ग्रामपंचायतीमधील प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 16:15 IST

तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे. उकळपेन येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांत गैरप्रकार झाल्याची, तर गोंडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमण हटविण्यात अपयशी ठरल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती.

वाशिम: तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे. उकळपेन येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांत गैरप्रकार झाल्याची, तर गोंडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमण हटविण्यात अपयशी ठरल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. या बाबत आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत. ही माहिती गुरुवारी प्राप्त झाली उकळीपेन येथे १३ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता कामात सरपंच, उपसरपंचआणि ग्रामसचिवांंनी अनियमितता व गैरप्रकार करून या कामात २८ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च केल्याची तक्रार कैलास भोयनवाड, मोतीराम कुटे, माधव लांडे, जीवन महाले, मोहनराव गांजरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली होती. त्याशिवाय सरपंच आणि ग्रामसचिवांनी इंदिरा आवास योजनेतही गैरप्रकार केल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणी वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलेल्या चौकशी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसचिवांनी सदर रस्ता कामात अतिरिक्त खर्च करताना कोणतीही तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता न घेतल्यामुळे सरपंच आणि उपसरपंच महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८ मधील कलम ३९(१) नुसार दोषी असल्याचा अहवाल दिला होता, तसेच सदर ग्रामपंचायतीला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये, असा सवाल पत्राद्वारे गटविकास अधिका-यांना केला होता; परंतु ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला काळ्या यादीत टाकण्याऐवजी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी करून अमरावती आयुक्तांनी उकळी पेनचे सरपंच आणि उपसरपंचांना पदासाठी अपात्र ठरविले. तसेच मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या निर्देशानुसार ग्रामसचिवांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिले. दरम्यान, गोंडेगाव येथील भाऊराव कोल्हे आणि गिरीराज चौधरी यांनी गावातील रस्ते, खुली जागा आणि नाल्यांवर केलेल अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली होती; परंतु सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांनी या कामास टाळाटाळ केल्यामुळे त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार करून सदर प्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह चार सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी ती मागणी फे टाळत आयुक्तांकडे प्रकरण वर्ग केले होते. आयुक्तांनी या प्रकरणी सर्व पुराव्यांची तपासणी करून निर्णय देताना सरपंच, उपसरपंच आणि दोन सदस्यांनाही पदासाठी अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत