शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

वाशिम तालुक्यातील दोन सरपंच, उपसरपंच अपात्र! उकळीपेन, गोेंडेगाव ग्रामपंचायतीमधील प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 16:15 IST

तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे. उकळपेन येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांत गैरप्रकार झाल्याची, तर गोंडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमण हटविण्यात अपयशी ठरल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती.

वाशिम: तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे. उकळपेन येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांत गैरप्रकार झाल्याची, तर गोंडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमण हटविण्यात अपयशी ठरल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. या बाबत आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत. ही माहिती गुरुवारी प्राप्त झाली उकळीपेन येथे १३ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता कामात सरपंच, उपसरपंचआणि ग्रामसचिवांंनी अनियमितता व गैरप्रकार करून या कामात २८ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च केल्याची तक्रार कैलास भोयनवाड, मोतीराम कुटे, माधव लांडे, जीवन महाले, मोहनराव गांजरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली होती. त्याशिवाय सरपंच आणि ग्रामसचिवांनी इंदिरा आवास योजनेतही गैरप्रकार केल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणी वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलेल्या चौकशी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसचिवांनी सदर रस्ता कामात अतिरिक्त खर्च करताना कोणतीही तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता न घेतल्यामुळे सरपंच आणि उपसरपंच महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८ मधील कलम ३९(१) नुसार दोषी असल्याचा अहवाल दिला होता, तसेच सदर ग्रामपंचायतीला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये, असा सवाल पत्राद्वारे गटविकास अधिका-यांना केला होता; परंतु ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला काळ्या यादीत टाकण्याऐवजी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी करून अमरावती आयुक्तांनी उकळी पेनचे सरपंच आणि उपसरपंचांना पदासाठी अपात्र ठरविले. तसेच मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या निर्देशानुसार ग्रामसचिवांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिले. दरम्यान, गोंडेगाव येथील भाऊराव कोल्हे आणि गिरीराज चौधरी यांनी गावातील रस्ते, खुली जागा आणि नाल्यांवर केलेल अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली होती; परंतु सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांनी या कामास टाळाटाळ केल्यामुळे त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार करून सदर प्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह चार सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी ती मागणी फे टाळत आयुक्तांकडे प्रकरण वर्ग केले होते. आयुक्तांनी या प्रकरणी सर्व पुराव्यांची तपासणी करून निर्णय देताना सरपंच, उपसरपंच आणि दोन सदस्यांनाही पदासाठी अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत