शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वीज पडून दोन ठार; तीन जखमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:56 IST

नाना जयराम टोंग व नारेगाव येथील धीरज गजानन दोरक यांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : वीज पडून दोनजण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील पिंपळगाव गुंजाटे व नारेगाव येथे ११ आॅक्टोंबर रोजी दुपारी १.३० व २.३० वाजताच्या दरम्यान घडल्या. नाना जयराम टोंग (५७) रा. पिंपळगाव गुंजाटे व धीरज गजानन दोरक (१६) रा. नारेगाव अशी मृतकांची नावे आहेत. तेजस्विनी नाना टोंग (५०), राम नाना टोंग (३०) दोघेही रा. पिंपळगाव गुंजाटे तसेच गजानन तुकाराम दोरक (४५) रा. नारेगाव अशी जखमींची नावे आहेत.रविवारी दुपारच्या सुमारास कारंजा तालुक्यासह पिंपळगाव गुंजाटे व नारेगाव शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह परतीचा संततधार पाऊस झाला. सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू असल्याने व अशातच पाऊस बरसल्याने सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी उपरोक्त व्यक्ती शेतात गेल्या होत्या. शेतात वीज पडल्याने पिंपळगाव गुंजाटे येथील नाना जयराम टोंग व नारेगाव येथील धीरज गजानन दोरक यांच्या यामध्ये मृत्यू झाला तर तेजस्विनी नाना टोंग, राम नाना टोंग दोघेही रा. पिंपळगाव गुंजाटे तसेच गजानन तुकाराम दोरक रा. नारेगाव हे जखमी झाले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी खासगी व कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १२ व १३ आॅक्टोबर रोजीदेखील अतिपावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून, विजेपासून संरक्षण म्हणून शेतकºयांनी अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा