शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पावसाने ओढ दिल्याने वृक्षलागवड मोहिमेसही लागला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 4:32 PM

पावसाने ओढ दिल्याने मोहिमेस ‘ब्रेक’ लागला असून गेल्या २० दिवसांत जेमतेम अडीच लाख वृक्षांचीच लागवड करणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, २० जुलै रोजी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनस्तरावरून राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेची जय्यत तयारी करून १ जुलैपासून ही मोहिम हाती देखील घेण्यात आली; मात्र पावसाने ओढ दिल्याने मोहिमेस ‘ब्रेक’ लागला असून गेल्या २० दिवसांत जेमतेम अडीच लाख वृक्षांचीच लागवड करणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, २० जुलै रोजी दिली.१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्याला ४३ लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट मिळाले आहे. त्यात वनविभाग आणि सामाजिक वनिकरणला सर्वाधिक उद्दीष्ट असून नगर परिषदा, नगर पंचायती, ग्रामपंचायतींसह सर्व प्रशासकीय कार्यालयांनाही उद्दीष्ट विभागून देण्यात आले आहे. त्यानुसार, १ जुलैपासून युद्धस्तरावर वृक्षलागवडीला सुरूवात देखील करण्यात आली होती; मात्र लावलेल्या वृक्षांची समाधानकारक वाढ होण्याकरिता पाण्याची नितांत गरज भासत असून पाणी उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे भर पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने गेल्या ८ ते १० दिवसांपासून वृक्षलागवड मोहिमेस प्रशासकीय पातळीवरून ‘ब्रेक’ देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत केवळ मालेगाव, मानोरा आणि वाशिम या तीन तालुक्यांमध्येच प्रामुख्याने सर्वाधिक वृक्षलागवड झाली असून मंगरूळपीरमध्ये तुरळक प्रमाणात; तर कारंजा आणि रिसोड या दोन तालुक्यांमध्ये अगदीच कमी प्रमाणात वृक्षलागवड झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिम