शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पावसाने ओढ दिल्याने वृक्षलागवड मोहिमेसही लागला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:32 IST

पावसाने ओढ दिल्याने मोहिमेस ‘ब्रेक’ लागला असून गेल्या २० दिवसांत जेमतेम अडीच लाख वृक्षांचीच लागवड करणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, २० जुलै रोजी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनस्तरावरून राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेची जय्यत तयारी करून १ जुलैपासून ही मोहिम हाती देखील घेण्यात आली; मात्र पावसाने ओढ दिल्याने मोहिमेस ‘ब्रेक’ लागला असून गेल्या २० दिवसांत जेमतेम अडीच लाख वृक्षांचीच लागवड करणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, २० जुलै रोजी दिली.१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्याला ४३ लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट मिळाले आहे. त्यात वनविभाग आणि सामाजिक वनिकरणला सर्वाधिक उद्दीष्ट असून नगर परिषदा, नगर पंचायती, ग्रामपंचायतींसह सर्व प्रशासकीय कार्यालयांनाही उद्दीष्ट विभागून देण्यात आले आहे. त्यानुसार, १ जुलैपासून युद्धस्तरावर वृक्षलागवडीला सुरूवात देखील करण्यात आली होती; मात्र लावलेल्या वृक्षांची समाधानकारक वाढ होण्याकरिता पाण्याची नितांत गरज भासत असून पाणी उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे भर पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने गेल्या ८ ते १० दिवसांपासून वृक्षलागवड मोहिमेस प्रशासकीय पातळीवरून ‘ब्रेक’ देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत केवळ मालेगाव, मानोरा आणि वाशिम या तीन तालुक्यांमध्येच प्रामुख्याने सर्वाधिक वृक्षलागवड झाली असून मंगरूळपीरमध्ये तुरळक प्रमाणात; तर कारंजा आणि रिसोड या दोन तालुक्यांमध्ये अगदीच कमी प्रमाणात वृक्षलागवड झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिम