शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पावसाने ओढ दिल्याने वृक्षलागवड मोहिमेसही लागला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:32 IST

पावसाने ओढ दिल्याने मोहिमेस ‘ब्रेक’ लागला असून गेल्या २० दिवसांत जेमतेम अडीच लाख वृक्षांचीच लागवड करणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, २० जुलै रोजी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनस्तरावरून राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेची जय्यत तयारी करून १ जुलैपासून ही मोहिम हाती देखील घेण्यात आली; मात्र पावसाने ओढ दिल्याने मोहिमेस ‘ब्रेक’ लागला असून गेल्या २० दिवसांत जेमतेम अडीच लाख वृक्षांचीच लागवड करणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, २० जुलै रोजी दिली.१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्याला ४३ लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट मिळाले आहे. त्यात वनविभाग आणि सामाजिक वनिकरणला सर्वाधिक उद्दीष्ट असून नगर परिषदा, नगर पंचायती, ग्रामपंचायतींसह सर्व प्रशासकीय कार्यालयांनाही उद्दीष्ट विभागून देण्यात आले आहे. त्यानुसार, १ जुलैपासून युद्धस्तरावर वृक्षलागवडीला सुरूवात देखील करण्यात आली होती; मात्र लावलेल्या वृक्षांची समाधानकारक वाढ होण्याकरिता पाण्याची नितांत गरज भासत असून पाणी उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे भर पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने गेल्या ८ ते १० दिवसांपासून वृक्षलागवड मोहिमेस प्रशासकीय पातळीवरून ‘ब्रेक’ देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत केवळ मालेगाव, मानोरा आणि वाशिम या तीन तालुक्यांमध्येच प्रामुख्याने सर्वाधिक वृक्षलागवड झाली असून मंगरूळपीरमध्ये तुरळक प्रमाणात; तर कारंजा आणि रिसोड या दोन तालुक्यांमध्ये अगदीच कमी प्रमाणात वृक्षलागवड झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिम