शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अमरावती विभागात वनशेती उपअभियानांतर्गत ९६.४३ हेक्टर क्षेत्रात वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:10 IST

वाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातील वनशेती उप अभियानाला अमरावती विभागात शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातील वनशेती उप अभियानाला अमरावती विभागात शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अंतर्गत विभागातील पाच जिल्ह्यात मिळून निर्धारित उद्दिष्टानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या मुदतीत ९६.४३ हेक्टर क्षेत्रावर वनवृक्ष व फळझाडांची लागवड शेतकºयांनी केली आहे. या योजनेसाठी विभागात २.७५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीही करण्यात आली आहे.वातावरणातील बदलांमुळे शेती क्षेत्रातील दुष्परिणाम कमी व्हावेत आणि शेतकरी खुशाल व्हावा यासाठी केंद्र शासनाने वनशेती विषयक धोरण २०१४ मध्येच लागू केले होते. शेतीपूरक वृक्षलागवडीचा क्षेत्र विस्तार हा या अभियानामागचा केंद्र शासनाच्या मुख्य उद्देश आहे. या योजनेचा व्यापक प्रसार करून शेतकºयांचा कल याकडे वळविण्याच्या सुचना कृषी विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांना देण्यात आल्या होत्या. या योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय रोपवाटिकेतून वनवृक्ष व फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या वृक्षांची निर्धारित उद्दिष्टानुसार शेतीचे परिघीय क्षेत्र व बांधाचा अधिकाधिक उपयोग करून वृक्ष लागवड केलेल्या शेतकºयांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत वृक्ष लागवडीसाठी झालेल्या खर्चापैकी ५० टक्के अनुदान मिळणार असून, सदर अनुदान शेतकºयांना चार वर्षात चार टप्प्यात देण्यात येणार आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण खूप अधिक असले तरी, कृषी विभागाकडून निर्धारित क्षेत्राच्या मर्यादेतील प्रत्येकी १०० रोपांची लागवड ३१ आॅक्टोबरपर्यंत केलेल्या लाभार्र्थी शेतकºयांनाच अनुदान देय असणार आहे. या अंतर्गत अमरावती विभागात निर्धारित ९६.४३ हेक्टर क्षेत्रातील वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

 शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांचा वनशेतीकडे कल वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या वनशेती उपअभियानातंर्गतजिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टानुसार शेतकºयांनी वृक्ष लागवड केली असून, योजनेचा कालावधी संपला आहे.-शीतल नागरेकृषी अधिकारी(शासकीय रोपवाटिका मंगरुळपीर)

टॅग्स :washimवाशिमforestजंगल