शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संचारबंदीतही सावरगाव परिसरात वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:00 IST

Washim News : सावरगाव कान्होबा या गावाला लागून असलेल्या परिसरात संचारबंदी व कोरोनाकाळाती बेसुमार वृक्षतोड होत आहे.

मानोरा : मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सावरगाव कान्होबा या गावाला लागून असलेल्या परिसरात संचारबंदी व कोरोनाकाळाती बेसुमार वृक्षतोड होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी वृक्षप्रेमींमधून मंगळवारी करण्यात आली.पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच वृक्षारोपण मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च करून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येते. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर वनतस्करांकडून कुºहाड चालविली जात असल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील सावरगाव कान्होबा गावाला लागून असलेल्या कोळंबी या गावचे वनतस्कर हे सावरगाव वनपरिक्षेत्रातील अनमोल आणि मोठ्या आकाराच्या सागवान, कडूनिंब, चंदन आणि आडजातीचे झाडे दिवसाढवळ्या व रात्रीही मोठ्या प्रमाणात तोडून  बैलगाडीच्या माध्यमातून वाहतूक करीत असल्याचे चित्र संचारबंदीतही दिसून येत आहे. सावरगावातून तोडलेल्या झाडांच्या बैलगाड्या राजरोसपणे नेत असताना वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सावरगाव कान्होबा येथे नियुक्तीला असलेले काही वन कर्मचारी हे दुरच्या तालुक्यातून अपडाऊन करीत असल्याने वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी वृक्षप्रेमींमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमforestजंगल