शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वाहतूक प्रभावित करणारी वाहने, फेरीवाल्यांना हटविले     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 3:38 PM

१६ एप्रिल रोजी सकाळपासूनच रस्त्यावर उभ्या राहणााºया वाहनांना, फेरीवाल्यांना हटविण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरांमध्ये भर रस्त्यावर आॅटो, जड वाहने उभी करुन वाहतूक प्रभावित होत असल्यासंदर्भात लोकमतने १३ व १५ एप्रिल रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची वाशिम शहर वाहतूक शाखेच्यावतिने दखल घेवून १६ एप्रिल रोजी सकाळपासूनच रस्त्यावर उभ्या राहणााºया वाहनांना, फेरीवाल्यांना हटविण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे. पोलिसांचा ताफा घेवून सदर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई नियमित ठेवण्याची मागणी होत आहे. १६ एप्रिल रोजी सकाळपासूनच शहर वाहतूक शाखेच्यावतिने ही कारवाई करण्यात आली असली तरी, येथे पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने रस्तयावर पुन्हा वाहने उभी राहणार नाही याबाबत वाहतूक शाखेने दक्षता घेण्याची मागणी नागरिकांच्यावतिने केल्या जात आहे.  शहरामध्ये भर रस्त्यांवर आॅटो, जड वाहने उभे राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान अतिशय रहदारीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत असल्यासंदर्भात सविस्तर वृतांकन लोकमतच्यावतिने करण्यात आले होते. रस्त्यावर वाहने उभी करण्याचा प्रकार शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी होत असल्याने  प्रवाशांना , पादचाºयांना व वाहनधारकांना शहरातील अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका, बसस्थानकचौक विशेषत: शहरातील सर्वात गजबजलेला पाटणी चौक मध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही येथे असे प्रकार घडले आहेत. त्यावेळी शहर वाहतूक शाखेने कारवाईही केली आहे. परंतु कारवाईनंतर काही तासातच परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याने शहर वाहतूक शाखेचा पाहिजे त्या प्रमाणात दबदबा दिसून येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. काही महिन्याआधी शहरामध्ये वाहतूक विस्कळीत होवू नये याकरिता पार्कींग व्यवस्था करण्यात आली होती. परंतु व्यापारी व पार्कींग संचालकांमध्ये वाद निर्माण झाल्याने ती संपुष्टात आली. त्यानंतर व्यापाºयांनी पुढाकार घेतल्याने आजच्या घडीला दुचाकी नागरिक व्यवस्थित वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा लावतांना दिसून येत आहे. असे असले तरी रस्त्यावर आॅटोधारक, लघुव्यावसायिक , फेरीवाले बिनधास्तपणे आपला व्यवसाय थाटत आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. १६ एप्रिलला सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर वाहने, फेरीवाले दिसून न आल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला.  नियमितता आवश्यक!रस्त्यावर उभी राहत असलेल्या वाहनांवर कारवाई नियमित होत नसल्याने एक ते दोन दिवसात परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही मोहीम नियमित ठेवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. याकरिता शहर वाहतूक शाखेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी