शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वाहतूक प्रभावित करणारी वाहने, फेरीवाल्यांना हटविले     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:39 IST

१६ एप्रिल रोजी सकाळपासूनच रस्त्यावर उभ्या राहणााºया वाहनांना, फेरीवाल्यांना हटविण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरांमध्ये भर रस्त्यावर आॅटो, जड वाहने उभी करुन वाहतूक प्रभावित होत असल्यासंदर्भात लोकमतने १३ व १५ एप्रिल रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची वाशिम शहर वाहतूक शाखेच्यावतिने दखल घेवून १६ एप्रिल रोजी सकाळपासूनच रस्त्यावर उभ्या राहणााºया वाहनांना, फेरीवाल्यांना हटविण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे. पोलिसांचा ताफा घेवून सदर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई नियमित ठेवण्याची मागणी होत आहे. १६ एप्रिल रोजी सकाळपासूनच शहर वाहतूक शाखेच्यावतिने ही कारवाई करण्यात आली असली तरी, येथे पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने रस्तयावर पुन्हा वाहने उभी राहणार नाही याबाबत वाहतूक शाखेने दक्षता घेण्याची मागणी नागरिकांच्यावतिने केल्या जात आहे.  शहरामध्ये भर रस्त्यांवर आॅटो, जड वाहने उभे राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान अतिशय रहदारीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत असल्यासंदर्भात सविस्तर वृतांकन लोकमतच्यावतिने करण्यात आले होते. रस्त्यावर वाहने उभी करण्याचा प्रकार शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी होत असल्याने  प्रवाशांना , पादचाºयांना व वाहनधारकांना शहरातील अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका, बसस्थानकचौक विशेषत: शहरातील सर्वात गजबजलेला पाटणी चौक मध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही येथे असे प्रकार घडले आहेत. त्यावेळी शहर वाहतूक शाखेने कारवाईही केली आहे. परंतु कारवाईनंतर काही तासातच परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याने शहर वाहतूक शाखेचा पाहिजे त्या प्रमाणात दबदबा दिसून येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. काही महिन्याआधी शहरामध्ये वाहतूक विस्कळीत होवू नये याकरिता पार्कींग व्यवस्था करण्यात आली होती. परंतु व्यापारी व पार्कींग संचालकांमध्ये वाद निर्माण झाल्याने ती संपुष्टात आली. त्यानंतर व्यापाºयांनी पुढाकार घेतल्याने आजच्या घडीला दुचाकी नागरिक व्यवस्थित वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा लावतांना दिसून येत आहे. असे असले तरी रस्त्यावर आॅटोधारक, लघुव्यावसायिक , फेरीवाले बिनधास्तपणे आपला व्यवसाय थाटत आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. १६ एप्रिलला सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर वाहने, फेरीवाले दिसून न आल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला.  नियमितता आवश्यक!रस्त्यावर उभी राहत असलेल्या वाहनांवर कारवाई नियमित होत नसल्याने एक ते दोन दिवसात परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही मोहीम नियमित ठेवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. याकरिता शहर वाहतूक शाखेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी