शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जनावरांची निर्दयतेने वाहनात कोंबून वाहतूक; कायद्याची पायमल्ली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 15:47 IST

वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देपशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे. मात्र, कायदा होऊन ५८ वर्षे होऊनही आजही जनावरांची चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उजागर झाला.प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यान्वये पशूंची वाहतूक करताना पशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. पशूंच्या वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. पशूंची वाहतूक करताना वाहनात पशूंच्या उपचारासाठी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. पशूंना वाहनात चढविणे आणि उतरविण्यासाठी योग्य आकाराच्या फलाटांची सोय असावी, पशूंना वाहतुकीदरम्यान बसण्यासाठी किमान ५ सेंटीमीटर मऊ गवताचे तळ असायला हवे, पशूंची वाहतूक करणारे वाहन पुरेसे तथा मोठ्या आकाराचे असावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत; परंतु यातील एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले. विनापरवाना चालते जनावरांची वाहतूक!वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम ९६ अन्वये पशूधनाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधित जनावर सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाºयांचे स्वास्थ तपाासणी प्रमाणपत्र जवळ असणे आवश्यक आहे. पशूंची वाहतूक करताना नियमानुसार तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडून विहित परवाना घेणेही बंधनकारक आहे. मात्र, वाशिममधील गुरांच्या बाजारातून होणाºया जनावरांच्या वाहतूकीदरम्यान बहुतांश वाहनधारकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. याकडे संबंधित त्या-त्या यंत्रणांनी लक्ष पुरविणे आवश्यक ठरत आहे. प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा १९६० मधील तरतुदीनुसारच जनावरांची वाहतूक व्हायला हवी. यासंदर्भात तपासणी मोहिम राबवून चुकीच्या पद्धतीने जनावरांची वाहतूक करणाºयांविरूद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाईल.- जयश्री दुतोंडेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार