शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची निर्दयतेने वाहनात कोंबून वाहतूक; कायद्याची पायमल्ली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 15:47 IST

वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देपशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे. मात्र, कायदा होऊन ५८ वर्षे होऊनही आजही जनावरांची चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उजागर झाला.प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यान्वये पशूंची वाहतूक करताना पशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. पशूंच्या वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. पशूंची वाहतूक करताना वाहनात पशूंच्या उपचारासाठी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. पशूंना वाहनात चढविणे आणि उतरविण्यासाठी योग्य आकाराच्या फलाटांची सोय असावी, पशूंना वाहतुकीदरम्यान बसण्यासाठी किमान ५ सेंटीमीटर मऊ गवताचे तळ असायला हवे, पशूंची वाहतूक करणारे वाहन पुरेसे तथा मोठ्या आकाराचे असावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत; परंतु यातील एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले. विनापरवाना चालते जनावरांची वाहतूक!वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम ९६ अन्वये पशूधनाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधित जनावर सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाºयांचे स्वास्थ तपाासणी प्रमाणपत्र जवळ असणे आवश्यक आहे. पशूंची वाहतूक करताना नियमानुसार तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडून विहित परवाना घेणेही बंधनकारक आहे. मात्र, वाशिममधील गुरांच्या बाजारातून होणाºया जनावरांच्या वाहतूकीदरम्यान बहुतांश वाहनधारकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. याकडे संबंधित त्या-त्या यंत्रणांनी लक्ष पुरविणे आवश्यक ठरत आहे. प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा १९६० मधील तरतुदीनुसारच जनावरांची वाहतूक व्हायला हवी. यासंदर्भात तपासणी मोहिम राबवून चुकीच्या पद्धतीने जनावरांची वाहतूक करणाºयांविरूद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाईल.- जयश्री दुतोंडेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार