शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

व्यापाऱ्यांनीही नियमाचे पालन करणे गरजेचे- जुगलकिशोर कोठारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:22 IST

व्यापारी मंडळाचे वाशिम जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण देशभरासह वाशिम जिल्ह्यातही संचारबंदी आणि  लॉकडाऊन  लागलेला आहे. यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता इतर व्यापार पूर्णत: ठप्प झाला आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा ह्यग्रीन झोनह्णमध्ये असल्याने ४ मे पासून व्यापार सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. तथापि, व्यापाऱ्यांची भुमिका काय असावी, याबाबत व्यापारी मंडळाचे वाशिम जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांच्याशी साधलेला हा संवाद... लॉकडाऊन मुळे जिल्ह्यातील व्यापाºयांचे किती नुकसान झाले?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि ह्यलॉकडाऊनह्णमुळे जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता जिल्ह्यातील इतर साहित्य विक्रीची सर्वच दुकाने गत ३८ दिवसांपासून कडेकोट बंद आहेत. यामुळे ६०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात ओढवलेल्या या आरिष्टामुळे मुख्यत: कपडा आणि सराफा व्यवसायाला जबर फटका बसला आहे. ४ मे पासून परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येईल. व्यापाºयांनी धीर धरावा.सर्व दुकाने उघडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहणार का?नजिकच्या हिंगोली, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि अकोला या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्या तुलनेत वाशिम जिल्हा सद्यातरी निरंक आहे. ही जिल्हावासीयांसाठी भुषणावह बाब असून हे चित्र असेच कायम राहण्यासाठी ४ मे पासून सर्व दुकाने उघडल्यानंतर विशेषत: व्यापाºयांनी व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास निश्चितपणे परिस्थिती नियंत्रणात राहील, असे आपणास वाटते.काय करावे लागणार?कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये, यासाठी ह्यफिजीकल डिस्टन्सिंगह्ण, मास्कचा नियमित वापर, रोखीऐवजी आॅनलाईन व्यवहार आदी बाबींकडे व्यापाºयांनी तद्वतच ग्राहकांनी लक्ष पुरवायला हवे.व्यापाºयांकडून नियमांचे पालन केले जाईल का?वाशिम जिल्ह्यातील सर्वच व्यापारी पुर्वीपासूनच नियमांचे पालन करणारे आहेत. गत ३८ दिवसांच्या ह्यलॉकडाऊनह्ण कालावधीत सर्वांनीच लाखो रुपयांचे नुकसान सहन करून आपापली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापपर्यंत टळला नसल्याने यापुढेही प्रशासन घालून देईल, त्या नियमांचे पालन जिल्ह्यातील व्यापारी निश्चितपणे करतील. दुकानांवर खरेदीसाठी येणाºया नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत