शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

मार्चनंतर शौचालयाचा निधी मिळणार नाही!

By admin | Updated: March 15, 2016 02:26 IST

कृती आराखड्यातील गावांची संधी हुकणार: कारंजा तालुक्याला सर्वाधिक फटका.

वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निवडलेल्या गावांना हगणदरीमुक्त होण्याची संधी ३१ मार्चनंतर गमवावी लागणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. पुढील आर्थिक वर्षात स्वच्छ भार त मिशनमधून या गावांना निधी देणे शक्य होणार नसल्याची माहिती आहे. २0१६-१७ या वर्षात निधी मिळाला नाही, तर या गावांना आपले गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर अवलंबून रहावे लागणार आहे. असे झाल्यास कारंजा तालुक्यातील गावांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. यामुळे कारंजा तालुक्यासह इतर गावांनी मार्च २0१६ पूर्वी शौचालयाची कामे उरकून निधी हस्तगत करण्याची शेवटची संधी आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालू आर्थिक वर्षात १५४ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी सध्या २0 ते २५ गावे हगणदरीमुक्त झाली आहेत. ३१ मार्चपयर्ंत यात आणखी जवळपास १५ गावांची भर पडू शकते. अर्थात शौचालयाचा १00 टक्के वापर व्हावा, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ह्यटमरेल जप्ती आणि गुड मॉनिर्ंग पथकह्ण यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र कृती आराखड्यात समाविष्ट करुनही सुमारे १00 ग्रामपंचाय तींना हगणदरीमुक्त करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला यश आले नसल्याने आता त्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. आता सन २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी नवीन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. नवीन कृती आराखड्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेली व लोकप्रतिनिधी यासाठी वेळ देऊ शकतील अशी गावे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. निधीची कमतरता असल्याने वर्षनिहाय गावाची निवड करुन निधी वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या आराखड्यात नवीन गावांसह चालू वर्षातील राहिलेली गावे समाविष्ट करण्यात येतील. मात्र, या गावातील शौचालयाचे अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अदा करण्यात येणार आहे. निधीची पुरेशी तरतूद नसल्याने शौचालय बांधकाम करणार्‍यांची गोची होत आहे. २0१५-१६ या वर्षात ३१ मार्चपर्यंंत शौचालयाची कामे झाली तरच अनुदान मिळणार असल्याने लाभार्थींंचा गोंधळ उडाला.