शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

कोरोनाचे निर्बंध कठोर करा; पण ‘लॉकडाऊन’ नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:38 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा ‘लॉकडाऊन’ लावण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे; मात्र यामुळे काहीच साध्य होणार नाही. उलट कसेबसे रुळावर आलेले व्यवसाय पुन्हा ठप्प होऊन उपासमार ओढवेल. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध अधिक कठोर करा; पण ‘लॉकडाऊन’ लावूच नका, असे स्पष्ट मत हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य व्यावसायिकांनी व्यक्त केले.

वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हळूहळू कोरोना संसर्गाने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ लावला. यामुळे सर्वच प्रकारचे व्यवसाय बंद झाल्याने आस्थापना मालकांसोबतच तेथील कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली. रस्त्यांवर फिरून भाजीपाला, फळे, खरमुरे, हारफुले, खेळणी, कटलरी सामान विक्री करणाऱ्या छोटे व्यावसायिकही ‘लॉकडाऊन’ काळात अक्षरश: देशोधडीला लागले. कोरोना रुग्णांचा ‘ग्राफ’ मात्र या काळातही विशेष कमी झाला नाही. आता तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाने बाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात फुगला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता पुन्हा ‘लॉकडाऊन’ लावण्याचे सुतोवाच शासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर कपडा विक्रेते, ज्वेलर्स, हार्डवेअर दुकानदार, भाजी व फळविक्रेते, थंडपेय विक्रेते, रसवंती चालक, चप्पल विक्रेत्यांसह अन्य सर्वसामान्य व्यावसायिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता ‘लॉकडाऊन’ने पूर्वीही फारसे काही साध्य झाले नाही आणि आताही ‘लॉकडाऊन’मुळे विशेष असा कुठलाच फायदा होणार नाही. याउलट आधीच अडचणीत सापडलेले व्यवसाय पूर्णत: ठप्प होतील. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ नकोच. त्याऐवजी कोरोनाविषयक निर्बंध अधिक कठोर करा, असा सूर उमटला.

.......................

गतवर्षी लावलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे सराफा व्यवसायाला मोठा फटका बसला. पुढील दोन वर्षे भरून न निघणारे नुकसान यामुळे झाले. आता पुन्हा तशी परिस्थिती उद्भवल्यास सुवर्णकारांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. शासनाने ‘लॉकडाऊन’ लावूच नये.

- सुभाष उकळकर, सराफा व्यावसायिक

.........................

गतवर्षी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला. बरेच दिवस व्यवसाय पूर्णत: बंद राहिल्याने उपासमारीची वेळ ओढवली होती. त्यामुळे आता ‘लॉकडाऊन’ लावूच नये. त्यापेक्षा नियम अधिक कठोर करायला हवे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हायला हवी.

- रामा इंगळे, फुलविक्रेता

.................

सायंकाळी पाचनंतर बाजारपेठ बंद होते. त्यामुळे कडक उन्हात बसून अंगाची लाहीलाही होत असतानाही पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय करावा लागतो. ‘लॉकडाऊन’ लागल्यास उपासमार ओढवणार आहे. मायबाप शासनाने याचा विचार करायला हवा.

- लताबाई हिवाळे, चिंच-निंबू विक्रेता

.............

वाशिममध्ये कुठलेही मोठे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे विकेल ते साहित्य घेऊन मी बाजारात बसतो. रविवारची होळी असल्याने त्यासाठी लागणाऱ्या साखरगाठ्यांच्या विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. ‘लॉकडाऊन’ लागल्यास व्यवसाय ठप्प होऊन बेरोजगार व्हावे लागणार आहे.

- कृष्णा नेमाडे, गाठी विक्रेता

...........

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ लावून बाजारपेठ पूर्णत: बंद न करता सकाळपासून दुपारी किमान दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. यामुळे व्यवसाय करता येईल आणि उद्देशही सफल होईल.

- शुभम उचाडे, माठ विक्रेता

...................

गतवर्षी ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला होता. त्यामुळे तब्बल ४२ दिवस घरीच बसावे लागले. व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर बसून चप्पल विक्री करित असून घरखर्च भागविणे शक्य होत आहे. पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागल्यास उपासमार ओढवेल. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ लावू नये.

- तुळशीराम धाडवे, चप्पल विक्रेता

.............

घरी दोन माणसे आजारी आहेत. यामुळे नाईलाजाने मला रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानात बसून व्यवसाय करावा लागत आहे. मागीलवर्षी ‘लॉकडाऊन’मुळे आर्थिक परिस्थिती पार बिघडली होती. तशी अवस्था आता व्हायला नको. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ नकोच.

- चंद्रकला घुगे, किरकोळ साहित्य विक्रेता

............

कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे खरेच शक्य असेल तर निश्चितपणे प्रशासनाने पुन्हा ‘लॉकडाऊन’ लावण्यास हरकत नाही; मात्र यामुळे काही साध्य होईल असे वाटत नाही. त्याऐवजी कोरोनाविषयक नियम अधिक कठोर करून नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचे सत्र अवलंबावे.

- संजय गुंडेकर, भाजीविक्रेता