शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

गावकऱ्यांच्या एकजुटीतून तपोवन गाव बनले ‘पाणीदार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:03 IST

Water Conservation News : पानी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येवर मात करीत गाव पाणीदार बनविले आहे.

- साहेबराव राठोडलोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार : वॉटरकप स्पर्धेने पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये एकजूट निर्माण केली. शासनावर अवलंबून राहण्याचा प्रघात मोडायला शिकवले आणि स्वकष्टाने आपल्या गावाला पाणीदार बनविण्याचा अनुभवही दिला. याच बळावर शेलूबाजार येथून जवळच असलेल्या तपोवन ग्रामवासीयांनी अंतर्गत राजकारणाला फाटा देता एकजुटीने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येवर मात करीत गाव पाणीदार बनविले आहे.तपोवन हे केवळ १ हजार ६५ लोकवस्तीचे गाव. मात्र येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची असायची. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शरदराव भानुदास येवले यांची जनतेतून सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर गावातील अंतर्गत राजकारणाला फाटा देत गावाचा विकास करण्याचा निश्चय केला. २०१८-१९ मध्ये पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला.  ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रमदानातून एकजूट दाखविल्याचा प्रत्यय दिला. मागील वर्षी श्रमदानातून ३ शेततळे निर्माण केले. त्यामुळे गावातील गुराढोरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली, सोबतच गावातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या ग्रामपंचायतचे बोअरवेलमध्ये आता दिवसभर पाणी पुरेल इतका जलसाठा वाढला. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या श्रमदानास ग्रामस्थांमध्ये चांगलाच उत्साह जाणवला. भारतीय जैन संघटनेकडून पोकलँड मिळाला. यासाठी जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत पोफळकर, शेलूबाजार ग्रा पं उपसरपंच रजनीश कर्नावट तसेच डॉ रिखबचंद कोठारी, मदनभाई येवले यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी २ व यावर्षी ४ असे ६ किलोमीटर नाला खोलीकरण करण्यात आले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकाराने तपोवन गाव जलसमृद्ध बनले आहे. पानी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, तालुका समन्वयक सुभाष गवई, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. गाव पाणीदार बनविण्यासाठी गावकरी, शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. गेल्या दोन वर्षांत गावातील पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व गावातील युवकांचे मोठे सहकार्य लाभले, असे सरपंच शरदराव भानुदास येवले यांनी सांगितले. 

कृषी विभागातर्फे जलसंधारणाची कामेगेल्यावर्षी २५० हेक्टर बांध बंदिस्त डिप सीसीटीची ५६ हेक्टर कामे केली. यंदाही कृषी विभागाकडून गॅबियन बंधारे निर्माण केले. एकाचे काम पूर्ण झाले तर २ प्रगतीपथावर आहे. २५ एलबीएस मंजुर आहेत. १ माती नाला बांध, ५ गावातील युवकांना कृषी विभागाच्यावतीने मधुमक्षिका पालनचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रशिक्षणावरुन चंद्रकांत येवले यांनी आपल्या शेतात तो प्रयोग यशस्वी केला आहे. कृषी सहाय्यक वर्षा भारती यांनी तपोवन गावाला आवश्यक त्या विविध कामाचे नियोजन केले आहे.

सामाजीक वनिकरण विभागाचेही सहकार्यपाणी फाउंडेशनमध्ये सहभागी तपोवन ग्रामवासीयांना सामजीक वनिकरण विभागाचेही पाठबळ मिळाले. पावसाळ्यापूवीर्चे ई क्लास जमीनीवर २० हेक्टर मध्ये २२ हजार २२० खड्डे १० बाय १० आकारात केले आहेत. यावर्षी नियोजनानुसार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पाणी क्षेत्रात पाणी अडविण्यासाठी समतल चर खोदण्यात आले. वृक्षलागवड क्षेत्रामध्ये गुरांपासून संरक्षण मिळावे म्हणून चर खोदले आहे. सदर कामे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर चौधरी यांच्या देखरेखखाली केली.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा