शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

गरिबांचे पोट भरणारेच राहताहेत उपाशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

वाशिम : गोरगरीब आणि गरजू व्यक्तींची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ...

वाशिम : गोरगरीब आणि गरजू व्यक्तींची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. याअंतर्गत जिल्ह्यात शिवभोजन थाळी वितरणाचे २७ केंद्र सुरू आहे. संबंधितांनी शासनाने ठरवून दिल्यानुसार त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकास मोफत जेवण उपलब्ध करून दिले; मात्र प्रशासकीय गलथानपणामुळे तीन ते चार महिन्यांपासून प्रती थाळी ५० रुपयांप्रमाणे मिळणारे लाखो रुपयांचे अनुदान प्रलंबित असल्याने केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात सध्या २७ शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित असून शहरात ही संख्या नऊ आहे. प्रत्येक थाळीमागे सरकारकडून केंद्र संचालकांना ५० रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, दिवसाला १५० थाळींचा हिशेब लावल्यास प्रतिदिवसाचे ७५०० रुपये; तर महिन्याकाठी २ लाख २५ हजार रुपये एका केंद्राचे देयक होते. अनुदानाची ही रक्कम दर १५ दिवसांनी अदा करणे बंधनकारक करण्यात आली आहे. असे असताना गत तीन ते चार महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवरून अनुदानाची रक्कमच न मिळाल्याने केंद्रचालक पुरते हैराण झाले आहेत. त्यातील काही केंद्र याच कारणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून प्रशासकीय गलथानपणाप्रति सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.

...................

सर्वसामान्य केंद्रचालक खर्च कसा भागविणार?

शिवभोजन थाळी केंद्रातून दैनंदिन १५० थाळी पुरविण्याची परवानगी आहे. त्यापोटी मिळणारे अनुदान केंद्र चालकांना गत चार ते पाच महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे भाजीपाला, किराणा साहित्य, गॅस, कामगारांची मजुरी, वीज देयक, दुकानभाड्याची तजवीज करताना केंद्र चालकांच्या नाकीनऊ येत आहे. प्रशासनाकडून पैसेच मिळत नसल्याने हा खर्च कसा भागविणार, असा सवाल केंद्र चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

................

केंद्रचालक होताहेत कर्जबाजारी

शिवभोजन थाळी योजनेमुळे गोरगरिबांची उपासमार टळली आहे; मात्र प्रशासकीय पातळीवरून देयके मिळत नसल्याने त्यांना जेऊ घालण्याकरिता केंद्र चालकांना कर्ज घेऊन खर्च भागवावा लागत आहे. प्रशासनाने दखल घेऊन शिवभोजन थाळी योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रलंबित देयके त्वरित अदा करावी, अशी मागणी होत आहे.

....................

दर १५ दिवसांनी देयक अदा करणे बंधनकारक

शिवभोजन थाळी योजनेंतर्गत कार्यान्वित केंद्रांना दैनंदिन खर्च भागविता यावा, यासाठी दर १५ दिवसांनी त्यांचे देयक अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र पुरवठा विभागाकडून अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असून तीन ते चार महिन्यांपासून देयक प्रलंबित असल्याने केंद्र चालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

................

कोट :

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे देयक यापूर्वी कधीच प्रलंबित राहिले नाही; मात्र गत तीन ते चार महिन्यांपासून बदली प्रक्रिया आणि काही तांत्रिक अडचणींमुळे देयक प्रलंबित राहण्याचा प्रश्न उद्भवला. तो लवकरच निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- सुनील महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

..................

कोट :

२१ जून रोजी अनसिंग येथे मला शिवभोजन थाळी वितरण केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येकास मोफत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे; मात्र त्याचे देय अनुदान मिळालेले नाही. यामुळे दैनंदिन खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे.

- सुनीता सावळे, अनसिंग

...........

शिवभोजन थाळी योजनेंतर्गत दैनंदिन १५० थाळी मोफत जेवण पुरविण्यात येत आहे; मात्र त्याचे देयक प्रशासनाकडे प्रलंबित आहे. ते मिळण्यासंबंधी वारंवार पाठपुरावा करूनही काही फायदा झाला नाही. देयक अदा झाल्यास खर्च भागविणे शक्य होणार आहे.

- गजानन दहात्रे, वाशिम