शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे पोट भरणारेच राहताहेत उपाशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

वाशिम : गोरगरीब आणि गरजू व्यक्तींची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ...

वाशिम : गोरगरीब आणि गरजू व्यक्तींची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. याअंतर्गत जिल्ह्यात शिवभोजन थाळी वितरणाचे २७ केंद्र सुरू आहे. संबंधितांनी शासनाने ठरवून दिल्यानुसार त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकास मोफत जेवण उपलब्ध करून दिले; मात्र प्रशासकीय गलथानपणामुळे तीन ते चार महिन्यांपासून प्रती थाळी ५० रुपयांप्रमाणे मिळणारे लाखो रुपयांचे अनुदान प्रलंबित असल्याने केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात सध्या २७ शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित असून शहरात ही संख्या नऊ आहे. प्रत्येक थाळीमागे सरकारकडून केंद्र संचालकांना ५० रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, दिवसाला १५० थाळींचा हिशेब लावल्यास प्रतिदिवसाचे ७५०० रुपये; तर महिन्याकाठी २ लाख २५ हजार रुपये एका केंद्राचे देयक होते. अनुदानाची ही रक्कम दर १५ दिवसांनी अदा करणे बंधनकारक करण्यात आली आहे. असे असताना गत तीन ते चार महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवरून अनुदानाची रक्कमच न मिळाल्याने केंद्रचालक पुरते हैराण झाले आहेत. त्यातील काही केंद्र याच कारणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून प्रशासकीय गलथानपणाप्रति सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.

...................

सर्वसामान्य केंद्रचालक खर्च कसा भागविणार?

शिवभोजन थाळी केंद्रातून दैनंदिन १५० थाळी पुरविण्याची परवानगी आहे. त्यापोटी मिळणारे अनुदान केंद्र चालकांना गत चार ते पाच महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे भाजीपाला, किराणा साहित्य, गॅस, कामगारांची मजुरी, वीज देयक, दुकानभाड्याची तजवीज करताना केंद्र चालकांच्या नाकीनऊ येत आहे. प्रशासनाकडून पैसेच मिळत नसल्याने हा खर्च कसा भागविणार, असा सवाल केंद्र चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

................

केंद्रचालक होताहेत कर्जबाजारी

शिवभोजन थाळी योजनेमुळे गोरगरिबांची उपासमार टळली आहे; मात्र प्रशासकीय पातळीवरून देयके मिळत नसल्याने त्यांना जेऊ घालण्याकरिता केंद्र चालकांना कर्ज घेऊन खर्च भागवावा लागत आहे. प्रशासनाने दखल घेऊन शिवभोजन थाळी योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रलंबित देयके त्वरित अदा करावी, अशी मागणी होत आहे.

....................

दर १५ दिवसांनी देयक अदा करणे बंधनकारक

शिवभोजन थाळी योजनेंतर्गत कार्यान्वित केंद्रांना दैनंदिन खर्च भागविता यावा, यासाठी दर १५ दिवसांनी त्यांचे देयक अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र पुरवठा विभागाकडून अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असून तीन ते चार महिन्यांपासून देयक प्रलंबित असल्याने केंद्र चालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

................

कोट :

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे देयक यापूर्वी कधीच प्रलंबित राहिले नाही; मात्र गत तीन ते चार महिन्यांपासून बदली प्रक्रिया आणि काही तांत्रिक अडचणींमुळे देयक प्रलंबित राहण्याचा प्रश्न उद्भवला. तो लवकरच निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- सुनील महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

..................

कोट :

२१ जून रोजी अनसिंग येथे मला शिवभोजन थाळी वितरण केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येकास मोफत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे; मात्र त्याचे देय अनुदान मिळालेले नाही. यामुळे दैनंदिन खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे.

- सुनीता सावळे, अनसिंग

...........

शिवभोजन थाळी योजनेंतर्गत दैनंदिन १५० थाळी मोफत जेवण पुरविण्यात येत आहे; मात्र त्याचे देयक प्रशासनाकडे प्रलंबित आहे. ते मिळण्यासंबंधी वारंवार पाठपुरावा करूनही काही फायदा झाला नाही. देयक अदा झाल्यास खर्च भागविणे शक्य होणार आहे.

- गजानन दहात्रे, वाशिम