शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 10:24 IST

परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी रितसर परवानगी घेऊन परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरूद्ध कडक कारवाई होणार आहे; याशिवाय तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात संबंधितांना भरती केले जाणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्यात एका रुग्णाचा अपवाद वगळता तुर्तास तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे तर काही प्र्रतिबंधात्मक उपाययोजना नव्याने अंमलात आणल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. या परवानगीनंतर रितसर प्रवास पास, त्यावर नमूद कारण आणि व्यक्तींची संख्या, ठिकाणाचे नाव राहणार असून, त्याची एक प्रत संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि आरोग्य अधिकाºयांकडे दिली जाणार आहे. या व्यक्तींवर तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाचा वॉच राहणार आहे. परजिल्ह्यात जाणे आणि परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात परतल्यानंतर संबंधितांना पुढील २० दिवस घरातच विलगीकरण म्हणून राहावे लागणार आहे. या २० दिवसात संबंधित इसम हा घराबाहेर फिरताना दिसला तर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणे आणि तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात त्याला भरती केले जाणार आहे.

तहसिलदार, आरोग्य अधिकाºयांचा वॉच

अत्यावश्यक काम तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात गेल्यानंतर परत स्वजिल्ह्यात आल्यानंतर संबंधितांवर तहसिलदार तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांचे २० दिवस विशेष लक्ष राहणार आहे. परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात आल्यानंतर सर्व संबंधितांची आरोग्य विभागातर्फे प्राथमिक स्वरुपात तपासणी केली जाते. संबंधित इसमांच्या हातावर ‘होम क्वारेंटीन’चे शिक्के मारले जातात. २० दिवस संबंधित नागरिकांचे त्याच्या घरातच विलगीकरण केले जाते. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार आहे.शासकीय इमारतीत पर्यायी व्यवस्था

दरम्यान, विनापरवानगी जिल्ह्यातील कोणत्याही गावात परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींपासून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था ही संबंधित गावातील जिल्हा परिषदेची शाळा किंवा अन्य शासकीय इमारतीत केली जाणार आहे. यासाठी पांघरून, पिण्याचे व वापरण्याचे पाणी, भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे. शाळेत वीज, स्वच्छता, वापरण्याचे पाणी याबाबतची व्यवस्था संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या