शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 10:24 IST

परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी रितसर परवानगी घेऊन परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरूद्ध कडक कारवाई होणार आहे; याशिवाय तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात संबंधितांना भरती केले जाणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्यात एका रुग्णाचा अपवाद वगळता तुर्तास तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे तर काही प्र्रतिबंधात्मक उपाययोजना नव्याने अंमलात आणल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. या परवानगीनंतर रितसर प्रवास पास, त्यावर नमूद कारण आणि व्यक्तींची संख्या, ठिकाणाचे नाव राहणार असून, त्याची एक प्रत संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि आरोग्य अधिकाºयांकडे दिली जाणार आहे. या व्यक्तींवर तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाचा वॉच राहणार आहे. परजिल्ह्यात जाणे आणि परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात परतल्यानंतर संबंधितांना पुढील २० दिवस घरातच विलगीकरण म्हणून राहावे लागणार आहे. या २० दिवसात संबंधित इसम हा घराबाहेर फिरताना दिसला तर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणे आणि तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात त्याला भरती केले जाणार आहे.

तहसिलदार, आरोग्य अधिकाºयांचा वॉच

अत्यावश्यक काम तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात गेल्यानंतर परत स्वजिल्ह्यात आल्यानंतर संबंधितांवर तहसिलदार तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांचे २० दिवस विशेष लक्ष राहणार आहे. परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात आल्यानंतर सर्व संबंधितांची आरोग्य विभागातर्फे प्राथमिक स्वरुपात तपासणी केली जाते. संबंधित इसमांच्या हातावर ‘होम क्वारेंटीन’चे शिक्के मारले जातात. २० दिवस संबंधित नागरिकांचे त्याच्या घरातच विलगीकरण केले जाते. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार आहे.शासकीय इमारतीत पर्यायी व्यवस्था

दरम्यान, विनापरवानगी जिल्ह्यातील कोणत्याही गावात परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींपासून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था ही संबंधित गावातील जिल्हा परिषदेची शाळा किंवा अन्य शासकीय इमारतीत केली जाणार आहे. यासाठी पांघरून, पिण्याचे व वापरण्याचे पाणी, भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे. शाळेत वीज, स्वच्छता, वापरण्याचे पाणी याबाबतची व्यवस्था संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या