शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 10:24 IST

परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी रितसर परवानगी घेऊन परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरूद्ध कडक कारवाई होणार आहे; याशिवाय तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात संबंधितांना भरती केले जाणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्यात एका रुग्णाचा अपवाद वगळता तुर्तास तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे तर काही प्र्रतिबंधात्मक उपाययोजना नव्याने अंमलात आणल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. या परवानगीनंतर रितसर प्रवास पास, त्यावर नमूद कारण आणि व्यक्तींची संख्या, ठिकाणाचे नाव राहणार असून, त्याची एक प्रत संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि आरोग्य अधिकाºयांकडे दिली जाणार आहे. या व्यक्तींवर तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाचा वॉच राहणार आहे. परजिल्ह्यात जाणे आणि परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात परतल्यानंतर संबंधितांना पुढील २० दिवस घरातच विलगीकरण म्हणून राहावे लागणार आहे. या २० दिवसात संबंधित इसम हा घराबाहेर फिरताना दिसला तर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणे आणि तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात त्याला भरती केले जाणार आहे.

तहसिलदार, आरोग्य अधिकाºयांचा वॉच

अत्यावश्यक काम तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात गेल्यानंतर परत स्वजिल्ह्यात आल्यानंतर संबंधितांवर तहसिलदार तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांचे २० दिवस विशेष लक्ष राहणार आहे. परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात आल्यानंतर सर्व संबंधितांची आरोग्य विभागातर्फे प्राथमिक स्वरुपात तपासणी केली जाते. संबंधित इसमांच्या हातावर ‘होम क्वारेंटीन’चे शिक्के मारले जातात. २० दिवस संबंधित नागरिकांचे त्याच्या घरातच विलगीकरण केले जाते. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार आहे.शासकीय इमारतीत पर्यायी व्यवस्था

दरम्यान, विनापरवानगी जिल्ह्यातील कोणत्याही गावात परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींपासून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था ही संबंधित गावातील जिल्हा परिषदेची शाळा किंवा अन्य शासकीय इमारतीत केली जाणार आहे. यासाठी पांघरून, पिण्याचे व वापरण्याचे पाणी, भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे. शाळेत वीज, स्वच्छता, वापरण्याचे पाणी याबाबतची व्यवस्था संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या