शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही - डाॅ. विजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 15:34 IST

Vijay Jadhav interview राज्य शासन पुरस्कार प्राप्त डाॅ. विजय जाधव यांची मुलाखत.

वाशिम : येथील राजस्थान महाविदयालयातील प्रा. डाॅ. विजय जाधव यांना त्यांच्या अस्वस्थ तांडा या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार योजने अंतर्गत शासकीय प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाला. जिल्हयात आधी साहित्यिक ना.च. कांबळे यांना पदमश्री तर जाधव यांच्या कथासंग्रहास राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांची घेतलेली मुलाखतआपणास मिळालेल्या पुरस्काराबद्दल काय सांगाल ?माझ्या "अस्वस्थ तांडा" या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार योजने अंतर्गत शासकीय प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाल्याने निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.     या पुरस्कारापर्यत मला ग्राथाली प्रकाशनाने पोहचविले आहे.त्या बद्दल प्रकाशकांचे आणि महाराष्ट्र शासनाचे मी मनःपूर्वक आभारी आहेकथा लेखनाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?२०१३ ची गोष्ट आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आमच्या तांड्यावर असताना अर्धा तांडा उस कापायला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूर भागात जात होते. आमचे भाऊ, बंद असल्याने मी त्यांना वाटी लावण्यासाठी ट्रकजवळ उभा होतो. लहानसा मुलगा ट्रक जवळ उभा राहून खूप रडत होता तर मी विचारणा केली असता कोणती दिड- दमडीची शाळा बुडते म्हणून पंधरा दिवसांपासून डोकं खातं आहे म्हणे. दोन झपके दिले तेव्हा सोबत यायला तयार झाला आहे मात्र आताही रडतचं आहे  या घटनेपासून कथा लििहणे सुरू केले.अस्वस्थ तांडा" या पुस्तकाबद्दल काय सांगाल ?या संग्रहातील सर्वंच कथा सत्य घटनेवर आधारित असून तांड्याच्या एकुणच अस्वस्थतेच्या वर्णन करणा-या आहेत.  "अस्वस्थ तांडा" या कथासंग्रहात तांड्याच्या समस्येबरोबर तांड्याच्या संस्कृती,प्रथा, परंपरेचे वर्णन आले आहेतांड्यात जगणा-या लोकांना तुम्ही तुमच्या साहित्यातून कोणता संदेश द्यालं? तांडा आजही प्रचंड दारिद्र्यात, अंधश्रद्धेत,अज्ञानात, व्येसनाधिनतेत जगत आहे.या सर्व समस्येवर मात करण्यासाठी माझ्या तांड्यातील तमाम बांधवांनी आपल्या लेकरांच्या शिक्षणावर भर द्यावा. त्यांना अंधश्रद्धेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करावं.  संत सेवालाल महाराजांनी, महानायक वसंतराव नाईक साहेबांनी सांगितलेल्या विज्ञानवादाचा स्विकार करून जीवन जगावे. सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या लोकशाहीचा वापर करून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या तत्वांचा वापर करून जगावे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत