शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मंगरुळपीरवासियांना २० दिवसांपासून पाणी पुरवठाच नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 17:22 IST

मंगरुळपीर: शहरातील नागरिकांना गेल्या २० दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नसून, हातपंपही कोरडे पडल्याने नागरिकांची पाण्याअभावी मोठे हाल सुरू आहेत.

ठळक मुद्दे आठ दिवसांआड, नंतर १० दिवसांआड आणि १५ दिवसांआड शहरात पाणी पुरवठा करण्यात येत होता.

मंगरुळपीर: शहरातील नागरिकांना गेल्या २० दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नसून, हातपंपही कोरडे पडल्याने नागरिकांची पाण्याअभावी मोठे हाल सुरू आहेत. पालिका प्रशासन मात्र सुस्त बसले असून, पदाधिकारीही पर्यायी उपाय योजनांबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. 

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा धरण आटले आहे. मृतसाठ्याच्या भरवशावर नागरिकांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रकार दोन महिन्यांपासून पालिका करीत आहे. त्यामुळे सुरुवातीला आठ दिवसांआड, नंतर १० दिवसांआड आणि १५ दिवसांआड शहरात पाणी पुरवठा करण्यात येत होता. नागरिकांना पर्याय नसल्याने मिळेल तेव्हा पाणी भरून काटकसरीने वापर करणे नागरिकांनी सुरू केले; परंतु आता मात्र नागरिकांना २० दिवसांच्या कालावधीतही पाणी पुरवठा न झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. खाजगी टँकरचा आधार घेणे नागरिकांनी सुरू केल्यानंतर आता खाजगी टँकरधारकांनीही आपले दर वाढविले आहेत. अवघ्या २ हजार लीटरचे टँकर २०० ते २२५ रुपयांपर्यंत विकले जाऊ लागले आहे. दुसरीकडे पालिकेचे पदाधिकारी मात्र निकामीच ठरेल, अशा ४ कोटी रुपयांच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेवर लक्ष केंद्रीत करून आहेत. विशेष म्हणजे सोनल धरणातून मोतसावंगा धरणापर्यंत पाणी आणण्याच्या या योजनेला मंगरुळपीर तालुक्यातील १२ गावच्या शेतकरी, ग्रामस्थांचा विरोध असून, तो मोडून काढण्यात आला तरी, ही योजना सुरू  होण्यास आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. तेव्हापर्यंत नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न सर्व नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पर्यायी उपाय योजनांसाठी पालिका प्रशासन आणि पदाधिकाºयांनी एकही बैठक आयोजित केल्याचे ऐकिवात नाही किंवा यासाठी पाठपुरावा करण्याचेही प्रयत्न झाले नाहीत. केवळ सोनल ते मोतसावंगा पाणी आणण्याच्या योजनेवरच पदाधिकारी का एवढे लक्ष देत आहेत, तेसुद्धा कळायला मार्ग नाही. 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी