शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीरवासियांना २० दिवसांपासून पाणी पुरवठाच नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 17:22 IST

मंगरुळपीर: शहरातील नागरिकांना गेल्या २० दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नसून, हातपंपही कोरडे पडल्याने नागरिकांची पाण्याअभावी मोठे हाल सुरू आहेत.

ठळक मुद्दे आठ दिवसांआड, नंतर १० दिवसांआड आणि १५ दिवसांआड शहरात पाणी पुरवठा करण्यात येत होता.

मंगरुळपीर: शहरातील नागरिकांना गेल्या २० दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नसून, हातपंपही कोरडे पडल्याने नागरिकांची पाण्याअभावी मोठे हाल सुरू आहेत. पालिका प्रशासन मात्र सुस्त बसले असून, पदाधिकारीही पर्यायी उपाय योजनांबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. 

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा धरण आटले आहे. मृतसाठ्याच्या भरवशावर नागरिकांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रकार दोन महिन्यांपासून पालिका करीत आहे. त्यामुळे सुरुवातीला आठ दिवसांआड, नंतर १० दिवसांआड आणि १५ दिवसांआड शहरात पाणी पुरवठा करण्यात येत होता. नागरिकांना पर्याय नसल्याने मिळेल तेव्हा पाणी भरून काटकसरीने वापर करणे नागरिकांनी सुरू केले; परंतु आता मात्र नागरिकांना २० दिवसांच्या कालावधीतही पाणी पुरवठा न झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. खाजगी टँकरचा आधार घेणे नागरिकांनी सुरू केल्यानंतर आता खाजगी टँकरधारकांनीही आपले दर वाढविले आहेत. अवघ्या २ हजार लीटरचे टँकर २०० ते २२५ रुपयांपर्यंत विकले जाऊ लागले आहे. दुसरीकडे पालिकेचे पदाधिकारी मात्र निकामीच ठरेल, अशा ४ कोटी रुपयांच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेवर लक्ष केंद्रीत करून आहेत. विशेष म्हणजे सोनल धरणातून मोतसावंगा धरणापर्यंत पाणी आणण्याच्या या योजनेला मंगरुळपीर तालुक्यातील १२ गावच्या शेतकरी, ग्रामस्थांचा विरोध असून, तो मोडून काढण्यात आला तरी, ही योजना सुरू  होण्यास आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. तेव्हापर्यंत नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न सर्व नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पर्यायी उपाय योजनांसाठी पालिका प्रशासन आणि पदाधिकाºयांनी एकही बैठक आयोजित केल्याचे ऐकिवात नाही किंवा यासाठी पाठपुरावा करण्याचेही प्रयत्न झाले नाहीत. केवळ सोनल ते मोतसावंगा पाणी आणण्याच्या योजनेवरच पदाधिकारी का एवढे लक्ष देत आहेत, तेसुद्धा कळायला मार्ग नाही. 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी