शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मुरघास बनविण्याच्या यंत्र खरेदीसाठी एकही प्रस्ताव नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:05 IST

जिल्ह्यात एकही प्रस्ताव प्राप्त नसल्याने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पात्र शेतकरी गटांना अर्ज करता येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८ मध्ये राज्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संभाव्य चाराटंचाईची धग कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांना मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान मिळणार होते. मात्र, यासाठी जिल्ह्यात एकही प्रस्ताव प्राप्त नसल्याने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पात्र शेतकरी गटांना अर्ज करता येईल.सन २०१८ च्या खरिप हंगामात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यात तसेच याव्यतिरिक्त २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ तर ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती राज्य शासनाने यापूर्वीच घोषित केलेली आहे. भविष्यात चारा टंचाई जाणवू नये याकरीता हिरव्या वैरणीचे मुल्यसंवर्धन करून पोषक ‘मुरघास’ तयार करण्याला प्राधान्य दिले जाते. नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पात जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत दुष्काळी भागातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांना मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान  दिले जाते. मात्र, यासाठी जानेवारी त फेब्रुवारी अशा दोन महिन्यात एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणुक निकालानंतरच अर्थात आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पात्र शेतकरी बचत गट व कंपन्यांना अर्ज करता येतील.

टॅग्स :washimवाशिम