शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुरघास बनविण्याच्या यंत्र खरेदीसाठी एकही प्रस्ताव नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:05 IST

जिल्ह्यात एकही प्रस्ताव प्राप्त नसल्याने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पात्र शेतकरी गटांना अर्ज करता येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८ मध्ये राज्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संभाव्य चाराटंचाईची धग कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांना मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान मिळणार होते. मात्र, यासाठी जिल्ह्यात एकही प्रस्ताव प्राप्त नसल्याने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पात्र शेतकरी गटांना अर्ज करता येईल.सन २०१८ च्या खरिप हंगामात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यात तसेच याव्यतिरिक्त २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ तर ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती राज्य शासनाने यापूर्वीच घोषित केलेली आहे. भविष्यात चारा टंचाई जाणवू नये याकरीता हिरव्या वैरणीचे मुल्यसंवर्धन करून पोषक ‘मुरघास’ तयार करण्याला प्राधान्य दिले जाते. नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पात जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत दुष्काळी भागातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांना मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान  दिले जाते. मात्र, यासाठी जानेवारी त फेब्रुवारी अशा दोन महिन्यात एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणुक निकालानंतरच अर्थात आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पात्र शेतकरी बचत गट व कंपन्यांना अर्ज करता येतील.

टॅग्स :washimवाशिम