------
परराज्यातील एकमेव फेरी बंदच
वाशिम: कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे; परंतु अद्यापही परराज्यात बसफेरी पाठविण्याबाबत आदेशच नसल्याने वाशिम आगारातून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे जाणारी बसफेरी ६ सप्टेंबरपर्यंतही सुरू झाली नाही. त्यामुळे या बसचा आधार असलेल्या प्रवाशांची पंचाईत कायमच आहे.
--------------------
खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत
वाशिम: खरीप हंगाम जोरावर असताना जिल्ह्यात व खतांचा तुडवडा निर्माण झाला आहे. आधीच पावसाअभावी कोमेजलेली पिके आता सावरत असताना खताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. खतासाठी शेतकरी विविध गावांमधील कृषी सेवा केंद्रात चकरा मारत आहेत.
---------------------
जिल्ह्यातील बहुतांश आठवडी बाजार बंदच
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आल्याने अनेक उद्योग, व्यवसायांना प्रशासनाने परवानगी दिली; परंतु अद्याप आठवडी बाजार भरविण्याचे स्पष्ट निर्देश नसल्याने अनेक ठिकाणच आठवडी बाजार अद्यापही बंदच आहेत. भाजीपाला लिलाव मात्र नियमित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
------------
वीज पुरवठ्यात व्यत्यय; कामकाज प्रभावित
वाशिम: गत काही दिवसांपासून वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. सोमवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले. ग्रामपंचायत कार्यालय, बँकांमधील कामांवर त्याचा परिणाम झाला.
----------