शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशीही अंत्यसंस्कार नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:10 IST

कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देसुनीलचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप करीत धोपे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री १० वाजता सुनील धोपे यांचे पार्थिव अमरावती येथील शवागारात पाठविण्यात आले.त्यांच्या मृत्यूला चार दिवस उलटले तरी, अंत्यसंस्कार पार पडू शकले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी झीरो एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन देऊनही धोपे कुटुंब पार्थिव ताब्यात घेण्यास तयार झाले नाही. सीमा सुरक्षा दलात मेघालयातील सिलाँग येथे कार्यरत असताना कारंजा येथील जवान सुनील ढोपे यांचा १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारंजा येथे दाखल झाले; परंतु सुनीलचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप करीत धोपे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री १० वाजता सुनील धोपे यांचे पार्थिव अमरावती येथील शवागारात पाठविण्यात आले. मंगळवार १८ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा पालिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी कारंजा धोपे कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी झीरो एफआयआर दाखल करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले; परंतु धोपे कुटुबांने त्यांचा प्रस्ताव फेटाळला. प्रत्यक्षात धोपे यांचा मृत्यू १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला चार दिवस उलटले तरी, अंत्यसंस्कार पार पडू शकले नाहीत. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजीही या प्रकरणी कारंजात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे एस टी बससेवा तसेच खाजगी वाहतूक देखील प्रभावित झाली होती.  विधवा पत्नी व्यथीत जवान धोपे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या विधवा पत्नी सविता धोपे म्हणाल्या की, त्यांच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, नोकरी सोडण्याचा पळपुटेपणा आपण करणार नसल्याचे पतीने म्हटले होते, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ते सहा महिन्यानंतरच एकदा रजेवर यायचे. मी सहा महिने त्यांची प्रतिक्षा करीत होती. आता कोणाची प्रतिक्षा करू, आमच्या मुला-बाळांचे कसे होईल, पतीला न्याय न मिळाल्यास आपण जिवाचे बरे वाईट करू, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा