शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशीही अंत्यसंस्कार नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:10 IST

कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देसुनीलचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप करीत धोपे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री १० वाजता सुनील धोपे यांचे पार्थिव अमरावती येथील शवागारात पाठविण्यात आले.त्यांच्या मृत्यूला चार दिवस उलटले तरी, अंत्यसंस्कार पार पडू शकले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी झीरो एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन देऊनही धोपे कुटुंब पार्थिव ताब्यात घेण्यास तयार झाले नाही. सीमा सुरक्षा दलात मेघालयातील सिलाँग येथे कार्यरत असताना कारंजा येथील जवान सुनील ढोपे यांचा १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारंजा येथे दाखल झाले; परंतु सुनीलचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप करीत धोपे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री १० वाजता सुनील धोपे यांचे पार्थिव अमरावती येथील शवागारात पाठविण्यात आले. मंगळवार १८ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा पालिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी कारंजा धोपे कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी झीरो एफआयआर दाखल करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले; परंतु धोपे कुटुबांने त्यांचा प्रस्ताव फेटाळला. प्रत्यक्षात धोपे यांचा मृत्यू १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला चार दिवस उलटले तरी, अंत्यसंस्कार पार पडू शकले नाहीत. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजीही या प्रकरणी कारंजात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे एस टी बससेवा तसेच खाजगी वाहतूक देखील प्रभावित झाली होती.  विधवा पत्नी व्यथीत जवान धोपे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या विधवा पत्नी सविता धोपे म्हणाल्या की, त्यांच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, नोकरी सोडण्याचा पळपुटेपणा आपण करणार नसल्याचे पतीने म्हटले होते, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ते सहा महिन्यानंतरच एकदा रजेवर यायचे. मी सहा महिने त्यांची प्रतिक्षा करीत होती. आता कोणाची प्रतिक्षा करू, आमच्या मुला-बाळांचे कसे होईल, पतीला न्याय न मिळाल्यास आपण जिवाचे बरे वाईट करू, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा