शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

घरचा कर्ता गेला; निधीअभावी ९० कुटुंबांचा लाभ रखडला; जिल्ह्यातील वास्तव

By नंदकिशोर नारे | Updated: October 10, 2023 15:56 IST

यंदा सहा तालुक्यातील ७४ कुटुंबांना लाभ

वाशिम : संसाराचा गाडा हाकताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर संसार अडचणीत येतो. अशा वेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या माध्यमातून अशा महिलांना शासकीय स्तरावर अनुदान देण्यात येते. यासाठी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा या योजनेसाठी १६४ कुटुंबांचे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी ७४ कुटुंबांना लाभ मिळाला असला तरी निधीअभावी ९० कुटुंबांना मात्र अद्यापही याचा लाभ मिळाला नाही.

दारिद्रयरेषेखालील रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर अडचणीत येणाऱ्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या २० हजार रुपयांच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील १६४ कुटुंबांकडून संबंधित तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर यासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून केवळ ७४ कुटुंबांनाच २० हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

तथापि, उर्वरित प्रस्तावांसाठी निधीच उपलब्ध नसल्याने ९० कुटुंबांना मात्र १० ऑक्टोबरपर्यंतही या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करीत जीवन जगावे लागत असल्याचे वास्तव आहे. शासनाकडून निधी मिळाल्यास या कुटुंबांना अनुदान मिळून कुटुंबाचा गाडा ओढताना आर्थिक अडचणीवर काही प्रमाणात मात करता येणार आहे. यामुळे मृत कुटुंबीयांकडून मदतीसाठी तहसील कार्यालयात येरझारा घातल्या जात आहेत.

अनुदानाची रक्कम अत्यल्प

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून दिला जाणारा निधी अल्प प्रमाणात आहे. केवळ २० हजारांच्या अनुदानातून आर्थिक हातभार होणे आजच्या महागाईच्या काळात अशक्य आहे. त्यामुळे शासनाने या योजनेच्या लाभार्थीना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासह प्रशासनाला वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थींकडून केली जात आहे.काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना?

- दारिद्ररेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.- राष्ट्रीय कुटुंब लाभ या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

कोणाला मिळते अनुदान?

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एक रकमी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात येते.

टॅग्स :washimवाशिम