शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

घरचा कर्ता गेला; निधीअभावी ९० कुटुंबांचा लाभ रखडला; जिल्ह्यातील वास्तव

By नंदकिशोर नारे | Updated: October 10, 2023 15:56 IST

यंदा सहा तालुक्यातील ७४ कुटुंबांना लाभ

वाशिम : संसाराचा गाडा हाकताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर संसार अडचणीत येतो. अशा वेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या माध्यमातून अशा महिलांना शासकीय स्तरावर अनुदान देण्यात येते. यासाठी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा या योजनेसाठी १६४ कुटुंबांचे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी ७४ कुटुंबांना लाभ मिळाला असला तरी निधीअभावी ९० कुटुंबांना मात्र अद्यापही याचा लाभ मिळाला नाही.

दारिद्रयरेषेखालील रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर अडचणीत येणाऱ्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या २० हजार रुपयांच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील १६४ कुटुंबांकडून संबंधित तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर यासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून केवळ ७४ कुटुंबांनाच २० हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

तथापि, उर्वरित प्रस्तावांसाठी निधीच उपलब्ध नसल्याने ९० कुटुंबांना मात्र १० ऑक्टोबरपर्यंतही या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करीत जीवन जगावे लागत असल्याचे वास्तव आहे. शासनाकडून निधी मिळाल्यास या कुटुंबांना अनुदान मिळून कुटुंबाचा गाडा ओढताना आर्थिक अडचणीवर काही प्रमाणात मात करता येणार आहे. यामुळे मृत कुटुंबीयांकडून मदतीसाठी तहसील कार्यालयात येरझारा घातल्या जात आहेत.

अनुदानाची रक्कम अत्यल्प

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून दिला जाणारा निधी अल्प प्रमाणात आहे. केवळ २० हजारांच्या अनुदानातून आर्थिक हातभार होणे आजच्या महागाईच्या काळात अशक्य आहे. त्यामुळे शासनाने या योजनेच्या लाभार्थीना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासह प्रशासनाला वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थींकडून केली जात आहे.काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना?

- दारिद्ररेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.- राष्ट्रीय कुटुंब लाभ या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

कोणाला मिळते अनुदान?

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एक रकमी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात येते.

टॅग्स :washimवाशिम