शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

घरचा कर्ता गेला; निधीअभावी ९० कुटुंबांचा लाभ रखडला; जिल्ह्यातील वास्तव

By नंदकिशोर नारे | Updated: October 10, 2023 15:56 IST

यंदा सहा तालुक्यातील ७४ कुटुंबांना लाभ

वाशिम : संसाराचा गाडा हाकताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर संसार अडचणीत येतो. अशा वेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या माध्यमातून अशा महिलांना शासकीय स्तरावर अनुदान देण्यात येते. यासाठी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा या योजनेसाठी १६४ कुटुंबांचे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी ७४ कुटुंबांना लाभ मिळाला असला तरी निधीअभावी ९० कुटुंबांना मात्र अद्यापही याचा लाभ मिळाला नाही.

दारिद्रयरेषेखालील रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर अडचणीत येणाऱ्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या २० हजार रुपयांच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील १६४ कुटुंबांकडून संबंधित तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर यासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून केवळ ७४ कुटुंबांनाच २० हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

तथापि, उर्वरित प्रस्तावांसाठी निधीच उपलब्ध नसल्याने ९० कुटुंबांना मात्र १० ऑक्टोबरपर्यंतही या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करीत जीवन जगावे लागत असल्याचे वास्तव आहे. शासनाकडून निधी मिळाल्यास या कुटुंबांना अनुदान मिळून कुटुंबाचा गाडा ओढताना आर्थिक अडचणीवर काही प्रमाणात मात करता येणार आहे. यामुळे मृत कुटुंबीयांकडून मदतीसाठी तहसील कार्यालयात येरझारा घातल्या जात आहेत.

अनुदानाची रक्कम अत्यल्प

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून दिला जाणारा निधी अल्प प्रमाणात आहे. केवळ २० हजारांच्या अनुदानातून आर्थिक हातभार होणे आजच्या महागाईच्या काळात अशक्य आहे. त्यामुळे शासनाने या योजनेच्या लाभार्थीना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासह प्रशासनाला वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थींकडून केली जात आहे.काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना?

- दारिद्ररेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.- राष्ट्रीय कुटुंब लाभ या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

कोणाला मिळते अनुदान?

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एक रकमी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात येते.

टॅग्स :washimवाशिम