शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाच मुलींनी दिला पित्याच्या पार्थिवास साश्रृनयनांनी खांदा व भडाग्नी

By नंदकिशोर नारे | Updated: September 21, 2023 14:32 IST

वाशिम येथील अकोला रस्त्यावर असलेल्या दत्त नगरमधील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी जिजेबा किसन पट्टेबहादूर (७१) यांचे २० सप्टेंबर राेजी रात्री उशिरा निधन झाले.

वाशिम : आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा नसेल तर रूढी परंपरेने मुलींना तो अधिकार दिलेला नाही. मात्र, हिंमतीने रूढींचे जू दूर करीत तो अधिकार मिळवता येत असल्याचे  एक उदाहरण वाशिम येथील भगिनींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा व अग्नी देऊन दाखवून दिले आहे. वाशिम येथील अकोला रस्त्यावर असलेल्या दत्त नगरमधील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी जिजेबा किसन पट्टेबहादूर (७१) यांचे २० सप्टेंबर राेजी रात्री उशिरा निधन झाले. त्यांना मुलगा नसून पाचही मुलीच आहेत.  

मुलगा नसल्याने मृत्यूनंतर  मुलींनी २१ सप्टेंबर रोजी साश्रृनयंनांनी वडिलास खांदा देऊन त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला . त्यांच्या या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक होत असतानाच अकाली गेलेल्या वडिलांच्या सेवेतील मुलींना बघून हळहळही व्यक्त केली जात होती. यावेळी जिजेबा यांच्या मुली उज्वला, रुपाली, पूजा, दिपाली, खुशी यांनी एकच आक्रोश केलेला दिसून आला. जिजेबा यांच्या मुली खासगी नोकरी तर काही जण शिक्षण घेत आहेत. 

दत्तनगर परिसरातील पट्टेबहादूर हे ए नामांकित व मनमिळावू कुटुंब आहे. मृत्यूनंतर होणारे सोपस्कार हा मुलगाच करु शकतो. ही खंत मनात न ठेवता पाचही मुलींनी जिजेबा यांना खांदा दिला व स्मशानभूमित रितीरिवाजानुसार सोपस्कार पूर्ण करीत पित्याला भडाग्नी देऊन मुलाची कमतरता या मुलींनी शेवटच्या क्षणालाही भासू दिली नाही. स्मशानभूमित शेकडो नातेवाईकांनी हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी बघितला. जिजेबा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांबाबत अनेकांमध्ये हळहळ व्यक्त केली .

अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या जावयासह एकावर घालाआपल्या सासरेबुवांचे निधन झाल्याची वार्ता कळताच  अंत्यसंस्कारासाठी रात्री उशिरा मोटारसायकलने पुणे येथून निघालेल्या जावयाचा व त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचे जावई यांचा मृत्यू अपघातात झाल्याची घटना संभाजीनगर नजिक २१ सप्टेंबर रोजी घडली. जिजेबा पट्टेबहादूर यांची दिपाली नामक मुलगी पुणे येथे वास्तव्यास आहे. मुलगी आाधीच वाशिम येथे आलेली होती. सासरेबुवा यांचे निधन झाल्याचे जावई विजय उत्तम इंगोले यांना कळाल्यावर ते व सोबत त्यांचे जावई सतिष रसाळ मोटारसायकलने वाशिम करता निघाले. रस्त्यात संभाजीनगरजवळ त्यांचा अपघात होऊन यात दोघांचा मृत्यू झाला. याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिम