शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले

By सुनील काकडे | Updated: September 24, 2022 17:34 IST

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे.

वाशिम

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे. या सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान करणे सुरू केले, अशी घणाघाती टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, २४ सप्टेंबर रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेली भारत जोडा पदयात्रा वाशिम जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. यानिमित्त प्रवासमार्गाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले आले असता, त्यांनी वाशिमच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, विविध स्वरूपातील अडचणी आणि समस्यांना वाचा फोडून देश वाचविण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वधर्मीयांना सोबत घेऊन भारत जोडा पदयात्रा आरंभीली आहे. या यात्रेत पंजा नव्हे; तर तिरंगा खांद्यावर घेण्यात आला आहे. त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

काॅंग्रेसने जनतेचा विश्वास सार्थ ठरविल्यानेच अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात याच पक्षाची सत्ता होती. त्या काळात पक्षाने कधीही व्देषाचे राजकारण केले नाही. कुणाच्याही मागे इडी लावली नाही. बेरोजगारी कमी करणे, महागाई नियंत्रणात ठेवणे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करणे यासह देशहिताचे निर्णय पक्षाने सातत्याने घेतले. सत्तेत नसताना महागाईविरोधात सर्वाधिक मोर्चे काॅंग्रेसनेच काढले. भर पावसात पक्षाने ७५ किलोमिटर तिरंगा यात्रा काढली, असे पटोले म्हणाले.पुलवामा हल्ल्याची सीबीआय चाैकशी गुलदस्त्यातमहाराष्ट्रात जेव्हापासून ‘इडी’चे सरकार आले, तेव्हापासून सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे सांगून २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याची सीबीआय चाैकशी अद्याप गुलदस्त्यात असल्याचे पटोले म्हणाले. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासाठी महाराष्ट्रातील नागपूरवरून बारूद गेल्याची शंका उपस्थित झाली होती, त्याची सीबीआय चाैकशी करण्याची ग्वाही सरकारने दिली होती; मात्र त्याचे नेमके काय झाले, असा सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केला.सरकार आंधळे, बहिरे आहे का?सध्या महागाई नियंत्रणाबाहेर आहे. बेरोजगारीचा आलेख उंचावत आहे. अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. बुरशीजन्य रोगाने सोयाबीनची अतोनात हानी झाली. असे असताना विद्यमान सरकार आंधळे, बहिऱ्याची भूमिका घेत आहे. वाशिम जिल्ह्यात येऊन गेलेले कृषिमंत्री झाडाला लागलेल्या १५० शेंगा दाखवत आहेत. ही जनतेची एकप्रकारे थट्टा असल्याची टिका पटोले यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले