शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले

By सुनील काकडे | Updated: September 24, 2022 17:34 IST

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे.

वाशिम

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे. या सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान करणे सुरू केले, अशी घणाघाती टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, २४ सप्टेंबर रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेली भारत जोडा पदयात्रा वाशिम जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. यानिमित्त प्रवासमार्गाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले आले असता, त्यांनी वाशिमच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, विविध स्वरूपातील अडचणी आणि समस्यांना वाचा फोडून देश वाचविण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वधर्मीयांना सोबत घेऊन भारत जोडा पदयात्रा आरंभीली आहे. या यात्रेत पंजा नव्हे; तर तिरंगा खांद्यावर घेण्यात आला आहे. त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

काॅंग्रेसने जनतेचा विश्वास सार्थ ठरविल्यानेच अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात याच पक्षाची सत्ता होती. त्या काळात पक्षाने कधीही व्देषाचे राजकारण केले नाही. कुणाच्याही मागे इडी लावली नाही. बेरोजगारी कमी करणे, महागाई नियंत्रणात ठेवणे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करणे यासह देशहिताचे निर्णय पक्षाने सातत्याने घेतले. सत्तेत नसताना महागाईविरोधात सर्वाधिक मोर्चे काॅंग्रेसनेच काढले. भर पावसात पक्षाने ७५ किलोमिटर तिरंगा यात्रा काढली, असे पटोले म्हणाले.पुलवामा हल्ल्याची सीबीआय चाैकशी गुलदस्त्यातमहाराष्ट्रात जेव्हापासून ‘इडी’चे सरकार आले, तेव्हापासून सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे सांगून २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याची सीबीआय चाैकशी अद्याप गुलदस्त्यात असल्याचे पटोले म्हणाले. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासाठी महाराष्ट्रातील नागपूरवरून बारूद गेल्याची शंका उपस्थित झाली होती, त्याची सीबीआय चाैकशी करण्याची ग्वाही सरकारने दिली होती; मात्र त्याचे नेमके काय झाले, असा सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केला.सरकार आंधळे, बहिरे आहे का?सध्या महागाई नियंत्रणाबाहेर आहे. बेरोजगारीचा आलेख उंचावत आहे. अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. बुरशीजन्य रोगाने सोयाबीनची अतोनात हानी झाली. असे असताना विद्यमान सरकार आंधळे, बहिऱ्याची भूमिका घेत आहे. वाशिम जिल्ह्यात येऊन गेलेले कृषिमंत्री झाडाला लागलेल्या १५० शेंगा दाखवत आहेत. ही जनतेची एकप्रकारे थट्टा असल्याची टिका पटोले यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले