शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Washim: रिव्हर्सची कटकट मिटणार; वळण रस्ता बायपासशी जोडणार

By दिनेश पठाडे | Updated: March 23, 2024 18:59 IST

Washim News: अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड हा राष्ट्रीय चारपदरी रस्ता तयार करण्यात आला असून महामार्ग चकाचक झाला आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, हिंगोलीहून वाशिम शहरात येण्यासाठी बायपासजवळील  वळण रस्त्यावर अवजड वाहनचालकांना तीन-चारदा रिव्हर्स गिअर टाकण्याची वेळ येत होती.

- दिनेश पठाडेवाशिम - अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड हा राष्ट्रीय चारपदरी रस्ता तयार करण्यात आला असून महामार्ग चकाचक झाला आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, हिंगोलीहून वाशिम शहरात येण्यासाठी बायपासजवळील  वळण रस्त्यावर अवजड वाहनचालकांना तीन-चारदा रिव्हर्स गिअर टाकण्याची वेळ येत होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून समस्या उजागर केली. त्याची दखल घेत काम सुरू करण्यात आले असून बायपास रस्ता वाशिम रस्त्याला जोडला जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग चारपदरी सिमेंट काँक्रिटीकरणाचा तयार करण्यात आला आहे. वाशिम शहरातील वाहतूककोंडीची समस्या निकाली निघावी यासाठी वाशिम शहरानजीक बायपास निर्माण केला.  मात्र, हिंगोलीवरून वाशिम शहरात येणाऱ्या वाहनचालकांना उड्डाणपुलाखालून वळण घेऊन पुन्हा डांबरीकरण रस्त्यावर यावे लागते. डांबरीकरण रस्त्यावर वळण घेताना विशेषत: अवजड वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती असून तीन ते चार वेळा वाहन रिव्हर्स घेण्याची वेळ येते.

त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जात होता, शिवाय अपघाताची भीती होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना बायपासजवळील जमीन उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे त्यावेळेस हे काम करणे शक्य झाले नाही. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली. आता नवीन कंत्राटदारामार्फत बायपास जवळ रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालून थेट वाशिममार्गाशी रस्ता जोडला जाणार असून रिव्हर्सची कटकट मिटणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकwashimवाशिम