शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चार बाजार समित्यांसाठी दुपारपर्यंत सरासरी ५९ टक्के मतदान

By संतोष वानखडे | Updated: April 30, 2023 13:33 IST

३० एप्रिल रोजी कारंजा, रिसोड, मालेगाव व मंगरूळपीर अशा चार बाजार समितीसाठी मतदानाला सुरूवात झाली.

वाशिम : जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मालेगाव व मंगरूळपीर अशा चार बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ संचालक पदासाठी ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला असून, दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी ५९ टक्के मतदान झाले.पहिल्या टप्प्यात वाशिम व मानोरा बाजार समितीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान झाले होते. २९ एप्रिल रोजी या दोन्ही बाजार समितीचा निकाल जाहिर झाला.

३० एप्रिल रोजी कारंजा, रिसोड, मालेगाव व मंगरूळपीर अशा चार बाजार समितीसाठी मतदानाला सुरूवात झाली. रिसोड बाजार समितीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघात ९२८ मतदार आहेत. याप्रमाणेच ग्रामपंचायत मतदारसंघात ७५३, आडते व व्यापारी मतदारसंघात २७४ तर हमाल व मापारी मतदारसंघात ५१८ मतदार आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत २४७३ मतदारांपैकी १६५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, याची टक्केवारी ६६.८० अशी येते.

मालेगाव बाजार समितीत २२८० मतदार असून, आतापर्यंत सरासरी ५७ टक्के मतदान झाले. कारंजा व मंगरूळपीर बाजार समितीतही अनुक्रमे ५६ व ५८ टक्के मतदान झाले. चार बाजार समिती मिळून सरासरी ५९ टक्के मतदान झाले असून, ढगाळ वातावरण असल्याने दुपारपर्यंत अधिकाधिक मतदान करण्यावर भर दिला जात असल्याचे मतदानाच्या आकड्यावरून दिसून येते.

आधी मतदान; मग कर्तव्य

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख, भाजपा, शिवसेना (शिंदे) प्रणीत पॅनल आणि आमदार अमित झनक, मित्रपक्ष व महाविकास आघाडी प्रणीत पॅनल अशा दोन पॅनलमध्ये तगडी लढत होत आहे. एका मताने सीटला धक्का पोहोचू नये नये म्हणून अधिकाधिक मतदार हे मतदान केंद्रात मतदानासाठी येत आहेत. रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल येथील सरपंच राहुल डोंगरे यांचे रविवारी (दि.३०) लग्न असून, बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :washimवाशिम