शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: January 6, 2017 19:24 IST

शासनाच्या हमीभावानुसार कापसाची खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्राला दोन महिन्यांत कापसाचे बोंडही खरेदी करता आले नाही.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 6 - शासनाच्या हमीभावानुसार कापसाची खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्राला दोन महिन्यांत कापसाचे बोंडही खरेदी करता आले नाही. शासनाकडून जाहीर मीभावापेक्षा जवळपास दीडपट भाव खासगी बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय केंद्राकडे पाठ केली आहे. आता यंदा मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस पडला असला तरी कपाशीचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात घटले आहे.  कपाशीसाठी मोठे परीश्रम घेऊनही या पिकाला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी या पिकाकडे पाठ केली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ३० हजार ८५७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती; परंतु यंदा केवळ १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला. मागील वर्षाप्रमाणच ९० टक्के क्षेत्र हे कारंजा आणि मानोºयातच आहे. यंदा १८ हजार ६३० हेक्टरमधील ११ हजार १०० हेक्टरवर क्षेत्र कारंजात, तर ६ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर मोनोऱ्यात कपाशीचा पेरा झाला. त्यावरून इतर तालुक्यात कपाशीची पेरणी नावापुरतीच झाल्याचे स्पष्ट होते. उत्पादन कमी असल्यामुळे मागणी अधिक आहे; परंतु शासनाने जाहीर केलेले  ४ हजार १६० रुपये क्विंटलचे तोकडे दर कापूस उत्पादक शेतकºयांच्या मुळावर घाव करणारे ठरले. शासनाच्या हमीभावापेक्षा जेमतेम ८०० रुपये अधिक भाव देऊ व्यापाºयांनी कपाशीची खरेदी सुरू केली. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर येथे १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सीसीआयमार्फत कापसाच्या शासकीय खरेदीची सुरुवात करण्यात आली तरी, ६ जानेवारी २०१७ पर्यंत  या ठिकाणी कपाशीच्या बोंडाचीही खरेदी होऊ शकली नाही. तोकडे हमीभाव जाहीर केल्यानंतर केवळ नावापुरते शासकीय कापूस खरेदी केंंद्र सुरू करून शासनाने जणू शेतकºयांची थट्टाच चालविली आहे, असे मत शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. दरम्यान, हंगाम संपत आला असताना आता कपाशीला व्यापाºयांकडून जवळपास सहा हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत.