शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांची भटकंती

By admin | Updated: May 12, 2017 17:14 IST

उच्च माध्यमीक शाळांमधील शिक्षक  रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.

मंगरुळपीर : नुकतेच शैक्षणिक सत्र संपले असुन प्राथमिक व माध्यमीक शाळांचे निकाल सुध्दा लागले आहेत. नवे शैक्षणिक सत्र सुरु होण्याकिरता बराच कालावधी शिल्लक असतांना बहूतांश  खाजगी प्राथमिक व माध्यमीक  तर काही ठिकाणी उच्च माध्यमीक शाळांमधील शिक्षक  रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.आधिच्या शासनाने मागेल त्याला खिरापतीप्रमाणे शाळा वाटल्याने विद्यार्थी संख्येचा प्रश्न बिकट झाला आहे. शाळा जास्त व विद्यार्थी कमी असे उलट चित्र यामुळे निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळेतील आवश्यक विद्याथीृ संख्या टिकविण्याकरिता शिक्षकांना त्यांच्या व्यवस्थापणाने विद्यार्थी संख्येचे लक्ष दिल्याचे समजते. शाळेतील एका तुकडीत  नियमाप्रमाणे पटसंख्या नसल्यास ती तुकडी रद्द होवून शिक्षक सुध्दा अतिरिक्त ठरतो.  त्यामुळे तुकडी व नोकरी वाचविण्याकरिता शिक्षकांना कसेही करुन आवश्यक विद्यार्थी संख्येचा भरणा करण्याशिवाय पर्यायच उरत नसल्याने अनेक  शाळांमधील शिक्षक हे सुट्टया असतांनाही भर उन्हात विद्यार्थी शोध मोहीम राबवितांना दिसत आहेत. यामध्ये अनुदानीत शाळांसह विना अनुदानीत शाळांचाही शिक्षकांचा समावेश असुन अनुदानीत शाळेतील शिक्षक हे  नोकरी जावु नये म्हणून तर विना अनुदानीत शाळेतील शिक्षक हे नोकरीसह शाळा अनुदानास पात्र या आशेवर विद्यार्थ्यांच्या शोधात जिवाचे रान करीत आहेत. आधिच खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी स्पर्धा जोरात असतांना जिल्हा परिषदेच्या शाळेला इयत्ता ५ वी व ८ वीचा वर्ग जोडण्यात आल्याचा निर्णय शासनाने घेतल्याने येथील बहूतांश विद्यार्थी हे खाजगी शाळांना मिळणार नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षक हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गणवेश,पुस्तके, वाहन व्यवस्था अशी आमीषे दाखवुन आमच्याच शाळेत पाल्याचे नाव टाका अशी विनवणी करीत आहेत तसेच विद्यार्थी संख्येचा गंभीर झालेला प्रश्न संस्थाचालकांनी सुध्दा गंभीरतेने घेत आपापल्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या बैठका घेवून अनेक संस्था चालकांनी शिक्षकांना विद्यार्थी संख्येचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे अनेक शिक्षक हे सुट्टीच्या दिवसातही शहरासह ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र आहे. तर केवळ कागदोपत्री विद्यार्थी संख्येची जुळवाजुळव करुन आपली संस्था चालवावी व अनुदान मिळावे  याकरिता शाळा न चालवता शाळेतुन अधिकाधिक गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी घडविल्यास शाळांना विद्यार्थी शोधण्याची वेळच येणार नसुन विद्यार्थीच शाळेकडे येतील असे मत यानिमित्ताने शिक्षणतज्ञ व्यक्त करीत आहेत.आपल्या शाळेतील तुकडया वाचविण्यासाठी शिक्षकांना मोठा आटापिटा करुन विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांचय पालकांना आमची शाळा किती चांगली पटवून देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.