शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

‘टीईटी’ उत्तीर्ण नसणारे शिक्षक सेवेत राहणार कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:54 IST

१३ फेब्रूवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तुर्तास सेवेतून काढू नये. तसेच संबंधितांचे वेतनही थांबवू नये, असे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्याचे व संबंधितांचे वेतन थांबविण्याची बाब प्रस्तावित होती; मात्र या धोरणास राज्यभरातून तीव्र स्वरूपात विरोध झाल्यामुळे अखेर ७ मे रोजी शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण संचालनाकांकडे पत्र पाठवून १३ फेब्रूवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तुर्तास सेवेतून काढू नये. तसेच संबंधितांचे वेतनही थांबवू नये, असे आदेश दिले आहेत.इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यास राज्यभरातील शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे शासनाने निर्णय रद्द ठरवत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांनी मंगळवारी परिपत्रकाच्या माध्यमातून संबंधित शिक्षकांचे पगार अडवू नये. यासह त्यांना कामावरून देखील कमी करू नये, असे आदेश दिले आहेत. ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त संधी देण्यात यावी, असेही कापडनिस यांनी यासंदर्भातील पत्रात नमूद केले आहे. यामुळे केवळ ‘टीईटी’ उत्तीर्ण नसल्याने सेवा समाप्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.‘टीईटी’चा अभ्यासक्रम नियोजित नसल्यामुळे शिक्षकांच्या गुणवत्तेचे मोजमाप केवळ ‘टीईटी’ने होऊ शकत नाही. त्यामुळे ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे पगार थांबविणे, त्यांना अचानक सेवेतून काढून टाकणे ही बाब अनुचित असल्याची बाब शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिवांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत अवर सचिवांनी राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे.- शेखर भोयरसंस्थापक, शिक्षक महासंघ, अमरावती

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक