शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ उत्तीर्ण नसणारे शिक्षक सेवेत राहणार कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:54 IST

१३ फेब्रूवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तुर्तास सेवेतून काढू नये. तसेच संबंधितांचे वेतनही थांबवू नये, असे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्याचे व संबंधितांचे वेतन थांबविण्याची बाब प्रस्तावित होती; मात्र या धोरणास राज्यभरातून तीव्र स्वरूपात विरोध झाल्यामुळे अखेर ७ मे रोजी शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण संचालनाकांकडे पत्र पाठवून १३ फेब्रूवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तुर्तास सेवेतून काढू नये. तसेच संबंधितांचे वेतनही थांबवू नये, असे आदेश दिले आहेत.इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यास राज्यभरातील शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे शासनाने निर्णय रद्द ठरवत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांनी मंगळवारी परिपत्रकाच्या माध्यमातून संबंधित शिक्षकांचे पगार अडवू नये. यासह त्यांना कामावरून देखील कमी करू नये, असे आदेश दिले आहेत. ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त संधी देण्यात यावी, असेही कापडनिस यांनी यासंदर्भातील पत्रात नमूद केले आहे. यामुळे केवळ ‘टीईटी’ उत्तीर्ण नसल्याने सेवा समाप्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.‘टीईटी’चा अभ्यासक्रम नियोजित नसल्यामुळे शिक्षकांच्या गुणवत्तेचे मोजमाप केवळ ‘टीईटी’ने होऊ शकत नाही. त्यामुळे ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे पगार थांबविणे, त्यांना अचानक सेवेतून काढून टाकणे ही बाब अनुचित असल्याची बाब शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिवांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत अवर सचिवांनी राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे.- शेखर भोयरसंस्थापक, शिक्षक महासंघ, अमरावती

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक