शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मंगरुळपीर शहरात दोनशेहून अधिक शौचालयांचे हप्ते थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:02 IST

मंगरुळपीर: शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत मंगरुळपीर शहरात उभारण्यात आलेल्या दोनशेहून अधिक शौचालयांचे हप्ते रखडले आहेत.

ठळक मुद्देशौचालय नसलेल्या कुटूंबांनी शौचालयासाठी अर्ज सादर केले आणि शौचालयांच्या कामांना प्रारंभही करण्यात आला. राज्यस्तरीय समितीने मंगरुळपीर शहराची पाहणी करून हागणदरीमुक्तीची घोषणाही केली; परंतु परिस्थिती काही वेगळेच दर्शवित आहे. मंजुरात देण्यात आलेल्या शौचालयांपैकी शेकडो शौचालये अद्यापही पूर्ण झाली नसून, संबंधित कुटूंबे अद्यापही उघड्यावर शौचास जात आहेत.

मंगरुळपीर: शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत मंगरुळपीर शहरात उभारण्यात आलेल्या दोनशेहून अधिक शौचालयांचे हप्ते रखडले आहेत. त्यामुळे पदरचा पैसा खर्चून बांधकाम करणारे लाभार्थी अडचणीत आले असून, अनेकांचे पुढील बांधकाम यामुळे ठप्प झाल्याने स्वच्छ भारत मिशनच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दोन वर्षांपूर्वी शौचालय नसलेल्या कुटूंबांचा सर्वे करण्यात आला आणि त्यांना शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यातील इतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच मंगरुळपीर नगर पालिकेच्यावतीनेही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटूंबांनी शौचालयासाठी अर्ज सादर केले आणि शौचालयांच्या कामांना प्रारंभही करण्यात आला. त्यानंतर राज्यस्तरीय समितीने मंगरुळपीर शहराची पाहणी करून हागणदरीमुक्तीची घोषणाही केली; परंतु परिस्थिती काही वेगळेच दर्शवित आहे. प्रत्यक्षात नगर पालिकेच्यावतीने मंजुरात देण्यात आलेल्या शौचालयांपैकी शेकडो शौचालये अद्यापही पूर्ण झाली नसून, संबंधित कुटूंबे अद्यापही उघड्यावर शौचास जात आहेत. त्याचे कारण म्हणजे शौचालय उभारणीसाठी शासनाकडून जी रक्कम बक्षीस म्हणून लाभार्थींना तीन टप्प्यात वितरित करण्यात येते. ती रक्कमच दोनशेपेक्षा अधिक लाभार्थींना मिळालेली नाही. काहींचे दुसºया टप्प्यातील, तर काहींचे तिसºया टप्प्यातील हप्ते रखडले आहेत. त्यामुळे त्यांना शौचालय पूर्ण करता आले नाही. या संदर्भात पालिकेतील संबंधित विभागाकडे चौकशी केल्यास तुमचा हप्ता बँकेत पाठविल्याचे सांगण्यात येत आणि बँकेकडे धनादेशच आले नसल्याचे लाभार्थींना सांगण्यात येते. या प्रकारामुळे मंगरुळपीर शहरात तरी, स्वच्छता अभियानाचा पार फज्जा पडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर