शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

अनुदानित वसतिगृहांमधील असुविधांमुळे विद्यार्थी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:10 IST

जिल्ह्यातील वसतिगृहांना सध्या आर्थिक टंचाईने ग्रासले असून, शासनाकडून पाठविल्या जाणार्‍या कपडे ठेवण्याच्या पेट्या, ताट-वाटी, गादी यासह इतर साहित्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने संस्थाचालकांसह विद्यार्थीही त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देसमाजकल्याणचे दुर्लक्षअनुदान मिळण्यासही होतोय विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ग्रामीण भागातील तथा आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी त्यांची राहण्याची, जेवणाची सोय व्हावी, या उद्देशाने सन १९२२ पासून राज्यभरात शासकीय अनुदानित मागासवर्गीय वसतिगृहे चालविली जातात; मात्र जिल्ह्यातील वसतिगृहांना सध्या आर्थिक टंचाईने ग्रासले असून, शासनाकडून पाठविल्या जाणार्‍या कपडे ठेवण्याच्या पेट्या, ताट-वाटी, गादी यासह इतर साहित्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने संस्थाचालकांसह विद्यार्थीही त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यात ५८ ठिकाणी निवासी वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्याना सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि सायंकाळचे जेवण, ग्रंथालयीन सुविधा, वर्षभरात दोन गणवेश, क्रमिक पाठय़पुस्तके, वह्या, स्टेशनरी यासह इतर सुविधा पुरविण्यात येतात. यासाठी तद्वतच वसतिगृहांवर आवश्यक वॉचमॅन, स्वयंपाकी, अधीक्षकांच्या पगारावर होणार्‍या खर्चापोटी दरवर्षी जुलै महिन्यात ६0 टक्के अग्रीम रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. यंदा मात्र नोव्हेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही ३0 पेक्षा अधिक वसतिगृहांना निधी मिळालेला नाही. याशिवाय शासनाकडून पाठविले जाणारे साहित्यदेखील निकृष्ट दर्जाचे असल्याने संस्थाचालकांसोबतच विद्यार्थीही त्रस्त झाले आहेत. 

वसतिगृहांमध्ये पुरेशा सुविधा पुरवा- ‘अभाविप’सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या वाशिम येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील समस्या दूर करून विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने २0 नोव्हेंबर रोजी जि.प. समाजकल्याण  अधिकार्‍यांकडे केली. सदर वसतिगृहातील पंखे नादुरुस्त असून, शौचालय व बाथरुममध्ये विजेची व्यवस्था नाही. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता होत नाही. विद्यार्थ्यांना नियमानुसार जेवण दिले जात नाही. या सर्व समस्यांमुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. येत्या दहा दिवसात या समस्या दूर न झाल्यास ‘अभाविप’च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृहांना देय असलेल्या रकमेचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, जुलैमध्ये देय असलेलेली ६0 टक्के अग्रीम रक्कम बहुतांश वसतिगृहांना देण्यात आली आहे. उर्वरित ४0 टक्के निधी मार्च २0१८ मध्ये दिला जाईल. याशिवाय शासनाकडून पाठविल्या जाणार्‍या साहित्यांबाबतही वसतिगृह संचालकांनी समाजकल्याण विभागाकडे रितसर तक्रारी दाखल कराव्यात. त्या शासनाकडे पाठवून निराकरण केले जाईल. - अमोल यावलीकरसमाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :Schoolशाळा