शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

वाशिम जिल्ह्यात आधार नोंदणी बंद, नागरिक अडचणीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:45 IST

वाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत.

ठळक मुद्दे १७ जुलैपासून जिल्ह्यात आधार नोंदणी बंद असल्याने विविध कामांसाठी आधार नोंदणी करणाºयांची मोठी पंचाईत झाली आहे. मराठा आरक्षणाच्या फॉर्मचे कमीशन, राजीव गांधी जीवनदायी कार्ड वाटपाचे कमीशन आणि मागील सत्रात आधार कार्डसाठी करार करण्यात आला होता. अनेक व्यक्ती यासाठी आधार केंद्रावर येत असले तरी, नोंदणीच बंद असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत. त्यामुळे १७ जुलैपासून वाशिमजिल्ह्यात आधार नोंदणी बंद असल्याने विविध कामांसाठी आधार नोंदणी करणाºयांची मोठी पंचाईत झाली आहे. ठिकठिकाणच्या आधार कें द्रांवर नागरिक चौकशी करून निराशेने परत जात आहेत. महा आॅनलाईन कंपनीकडून कर्जमाफीच्या अर्जांचे कमीशन, मराठा आरक्षणाच्या फॉर्मचे कमीशन, राजीव गांधी जीवनदायी कार्ड वाटपाचे कमीशन आणि मागील सत्रात आधार कार्डसाठी करार करण्यात आला होता. त्यासाठी ५० हजार रुपये अनामत रक्कम भरण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्र चालकांनी आधार नोंदणीचे काम करण्यास नकार दिला होता. यावेळी ५० हजार रुपये अनामतीची अट शिथील केल्यानंतर सर्वत्र पुन्हा आधार नोंदणी सुरू झाली; परंतु आता पुन्हा आधार नोंदणीसाठी केंद्र चालकांना ही अट ठेवण्यात आली आहे. त्यातच ७/१२ बंद केल्याने केंद्र चालकांच्या रोजंदारीत मोठी घट झाली आहे. आता ५० हजार रुपये अनामत न भरल्यास आधार मशीन बंद करून कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधीत यंत्रणेकडून सांगण्यात आले. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्रधारकांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून ५० हजार रुपये अनामतीची जाचक अट रद्द करण्याची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही दिला;परंतु त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १७ जुलै रोजीच जिल्ह्यातील ५४ आधार केंद्रधारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे जमा केल्या. त्यामुळे जिल्हाभरात आधार नोंदणी बंद झाली असून, आधार कार्ड नसलेले विद्यार्थी, निराधार लाभार्थींसह इतर नागगरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.   पॅनकार्डधारक, विद्यार्थ्यांची गोचीसध्या सर्वत्र शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. शिष्यवृत्ती ही बँकखात्यावर जमा होते आणि बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही. त्यामुळे त्यांना आधार नोंदणी करून मुदतीच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे; परंतु आधार नोंदणीच बंद असल्याने या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली असून, निर्धारित मुदतीत केवळ आधारअभावी अर्ज सादर करणे शक्य झाले नाही, तर त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्याशिवाय पॅनकार्डवरील जन्मतारखेसाठी आधार आवश्यक असून, विविध कामांसाठी पॅनकार्ड आवश्यक असल्याने अनेक व्यक्ती यासाठी आधार केंद्रावर येत असले तरी, नोंदणीच बंद असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड