शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

वाशिम जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; तरीही कृत्रिम टंचाईचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 11:29 IST

Fertilizers in Washim distric : कृत्रिम टंचाई भासविण्याचा प्रयत्नही विक्रेत्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कृषी विभागाच्या अहवालानुसार ३९ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे तर दुसरीकडे काही विशिष्ट खतांची कृत्रिम टंचाई भासविण्याचा प्रयत्नही विक्रेत्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कृषी विभागाची भरारी पथके सक्रिय झाली असून, जादा दराने खतविक्री झाल्यास विक्रेत्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.खरीप हंगाम तोंडावर आला असून, खते, बियाण्यांची खरेदी करण्याकडे शेतकरी वळत आहेत. यंदा विशेषत: डीएपी खताच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. खताच्या किमती कमी करण्याची मागणी सर्वच स्तरातून झाल्यानंतर अनुदानात वाढ करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता डीएपी खत हे १,२०० रुपयांत उपलब्ध झाले आहे. विविध कंपन्या व ग्रेडनिहाय खतांच्या किमती जाहीर झाल्या असून, या दरानेच शेतकऱ्यांना खत उपलब्ध व्हावे, याकरिता कृषी विभाग सज्ज झाला आहे. खतांच्या किमती व विक्री यासंदर्भात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून सात भरारी पथकांनी जिल्हाभर दौरे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाने भरारी पथकातील सदस्यांचे संपर्क क्रमांक तसेच दरपत्रक कृषी सेवा केंद्रात दर्शनी भागात लावण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ३९ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनीही कंपनीनिहाय व ग्रेडनिहाय जाहीर केलेल्या दराप्रमाणेच रासायनिक खताची खरेदी करावी तसेच रासायनिक खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी, असे आवाहन केले. दरम्यान, अन्य खतांच्या तुलनेत आता डीएपी खताचे दर कमी झाल्याने या खताला मागणी वाढली आहे. जिल्ह्यात सध्या १,५०० मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध आहे. मात्र, वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथे डीएपी खताची कृत्रिम टंचाई भासवली जात असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. (प्रतिनिधी)

खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कृषीनिविष्ठासंदर्भातील अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (१८००२३३४०००) संपर्क साधावा. खत, बियाण्यांसंदर्भात काही अडचण असल्यास नजीकच्या कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी किंवा संनियंत्रण कक्षाशी संपर्क साधवा.- व्ही.एस. बंडगर, कृषि विकास अधिकारी

कंपनीने जाहीर केलल्या ग्रेडनिहाय खताच्या किमतीपेक्षा जादा दराने कोणत्याही कृषि सेवा केंद्र संचालकाने विक्री करु नये अन्यथा त्यांचा खत परवाना खत नियंत्रण आदेशान्वये रद्द केला जाईल. शेतक-यांनी किमतीविषयी अथवा खताविषयी शंका, अडचन असल्यास तात्काळ कृषि विभागाकडे संपर्क साधावा.- शंकर तोटावार,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी