शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे सुप वाजले

By संतोष वानखडे | Updated: February 11, 2024 18:32 IST

सामाजिक चळवळ, पर्यावरणासह विविध विषयांना घातला हात : साहित्यिकांची मांदियाळी

वाशिम: स्थानिक स्वागत लाॅन येथे दोन दिवस सुरू असलेल्या चौथ्या राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे रविवारी (दि.११) सुप वाजले. मध्ययुगीन भक्ती चळवळींचे सामाजिक उत्थानातील योगदान, पर्यावरण संरक्षणासाठी संतांची हाक यांसह अन्य विषयांना साहित्यिक, लेखकांनी हात घालत या संमेलनाची सांगता झाली.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, वचन अकादमी, महाराष्ट्र बसव परिषद आणि बसव विचार केंद्र वाशिम यांच्यासंयुक्त विद्यमाने वाशिम येथील स्वागत लाॅन येथे १० फेब्रुवारीला चौथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली होती. रविवारी (दि.११) दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली. दुपारी १२ वाजताच्या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिद्ध लेखिका डाॅ. नलिनीताई वाघमारे होत्या. डॉ. वाघमारे यांनी समाज माध्यमाच्या जास्त आहारी जाऊन नये तसेच प्रत्येक गोष्टीबाबत तार्किक पडताळणी करावी, असे विचार व्यक्त केले.

इचलकरंजी येथील प्रसिद्ध लेखक डाॅ. विनायक होगाडे यांनी मध्ययुगीन भक्ती चळवळीचे सामाजिक उत्थानातील योगदान या विषयावर विचार व्यक्त केले. मध्ययुगीन भक्ती चळवळीला त्यांनी उजाळा दिला. उदगिर येथील प्रसिद्ध लेखक डॉ. मल्लिकार्जुन तंगावार यांनी ‘पर्यावरण संरक्षणासाठी संतांची हाक’ या विषयावर प्रकाश टाकला. आजरोजी पर्यावरणीय संतुलन बिघडविण्यास अनेक घटक कारणीभूत असल्याचे नमूद करीत पर्यावरण संरक्षणासाठी संत-महतांनी मोठे योगदान दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या काळात पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यवतमाळ येथील प्रसिद्ध लेखिका प्रा. सीमा शेटे-नवलाखे यांनी ‘अक्कमहादेवी- जिजाऊ -सावित्री यांचा वारसा आणि आजची स्त्री’ या विषयावर विचार व्यक्त करताना स्त्रियांच्या उज्वल इतिहासाला उजाळा दिला. समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशिमचे प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश लोध, संमेलनाचे स्वागताध्यक्ष काशिनाथआप्पा लाहोरे, दीपकआप्पा गाडे, किशोरआप्पा पेंढारकर, विश्वंबरआप्पा महाजन, अध्यक्ष बसव विचार केंद्र वाशिम, संजय आप्पा खेलुरकर यांची उपस्थिती होती. समारोपिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु जुबरे तर आभार वचन अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सचितानंद बिचेवार यांनी मानले. बसव साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेकरिता सर्व आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिम