शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे सुप वाजले

By संतोष वानखडे | Updated: February 11, 2024 18:32 IST

सामाजिक चळवळ, पर्यावरणासह विविध विषयांना घातला हात : साहित्यिकांची मांदियाळी

वाशिम: स्थानिक स्वागत लाॅन येथे दोन दिवस सुरू असलेल्या चौथ्या राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे रविवारी (दि.११) सुप वाजले. मध्ययुगीन भक्ती चळवळींचे सामाजिक उत्थानातील योगदान, पर्यावरण संरक्षणासाठी संतांची हाक यांसह अन्य विषयांना साहित्यिक, लेखकांनी हात घालत या संमेलनाची सांगता झाली.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, वचन अकादमी, महाराष्ट्र बसव परिषद आणि बसव विचार केंद्र वाशिम यांच्यासंयुक्त विद्यमाने वाशिम येथील स्वागत लाॅन येथे १० फेब्रुवारीला चौथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली होती. रविवारी (दि.११) दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली. दुपारी १२ वाजताच्या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिद्ध लेखिका डाॅ. नलिनीताई वाघमारे होत्या. डॉ. वाघमारे यांनी समाज माध्यमाच्या जास्त आहारी जाऊन नये तसेच प्रत्येक गोष्टीबाबत तार्किक पडताळणी करावी, असे विचार व्यक्त केले.

इचलकरंजी येथील प्रसिद्ध लेखक डाॅ. विनायक होगाडे यांनी मध्ययुगीन भक्ती चळवळीचे सामाजिक उत्थानातील योगदान या विषयावर विचार व्यक्त केले. मध्ययुगीन भक्ती चळवळीला त्यांनी उजाळा दिला. उदगिर येथील प्रसिद्ध लेखक डॉ. मल्लिकार्जुन तंगावार यांनी ‘पर्यावरण संरक्षणासाठी संतांची हाक’ या विषयावर प्रकाश टाकला. आजरोजी पर्यावरणीय संतुलन बिघडविण्यास अनेक घटक कारणीभूत असल्याचे नमूद करीत पर्यावरण संरक्षणासाठी संत-महतांनी मोठे योगदान दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या काळात पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यवतमाळ येथील प्रसिद्ध लेखिका प्रा. सीमा शेटे-नवलाखे यांनी ‘अक्कमहादेवी- जिजाऊ -सावित्री यांचा वारसा आणि आजची स्त्री’ या विषयावर विचार व्यक्त करताना स्त्रियांच्या उज्वल इतिहासाला उजाळा दिला. समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशिमचे प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश लोध, संमेलनाचे स्वागताध्यक्ष काशिनाथआप्पा लाहोरे, दीपकआप्पा गाडे, किशोरआप्पा पेंढारकर, विश्वंबरआप्पा महाजन, अध्यक्ष बसव विचार केंद्र वाशिम, संजय आप्पा खेलुरकर यांची उपस्थिती होती. समारोपिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु जुबरे तर आभार वचन अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सचितानंद बिचेवार यांनी मानले. बसव साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेकरिता सर्व आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिम