शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे सुप वाजले

By संतोष वानखडे | Updated: February 11, 2024 18:32 IST

सामाजिक चळवळ, पर्यावरणासह विविध विषयांना घातला हात : साहित्यिकांची मांदियाळी

वाशिम: स्थानिक स्वागत लाॅन येथे दोन दिवस सुरू असलेल्या चौथ्या राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे रविवारी (दि.११) सुप वाजले. मध्ययुगीन भक्ती चळवळींचे सामाजिक उत्थानातील योगदान, पर्यावरण संरक्षणासाठी संतांची हाक यांसह अन्य विषयांना साहित्यिक, लेखकांनी हात घालत या संमेलनाची सांगता झाली.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, वचन अकादमी, महाराष्ट्र बसव परिषद आणि बसव विचार केंद्र वाशिम यांच्यासंयुक्त विद्यमाने वाशिम येथील स्वागत लाॅन येथे १० फेब्रुवारीला चौथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली होती. रविवारी (दि.११) दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली. दुपारी १२ वाजताच्या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिद्ध लेखिका डाॅ. नलिनीताई वाघमारे होत्या. डॉ. वाघमारे यांनी समाज माध्यमाच्या जास्त आहारी जाऊन नये तसेच प्रत्येक गोष्टीबाबत तार्किक पडताळणी करावी, असे विचार व्यक्त केले.

इचलकरंजी येथील प्रसिद्ध लेखक डाॅ. विनायक होगाडे यांनी मध्ययुगीन भक्ती चळवळीचे सामाजिक उत्थानातील योगदान या विषयावर विचार व्यक्त केले. मध्ययुगीन भक्ती चळवळीला त्यांनी उजाळा दिला. उदगिर येथील प्रसिद्ध लेखक डॉ. मल्लिकार्जुन तंगावार यांनी ‘पर्यावरण संरक्षणासाठी संतांची हाक’ या विषयावर प्रकाश टाकला. आजरोजी पर्यावरणीय संतुलन बिघडविण्यास अनेक घटक कारणीभूत असल्याचे नमूद करीत पर्यावरण संरक्षणासाठी संत-महतांनी मोठे योगदान दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या काळात पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यवतमाळ येथील प्रसिद्ध लेखिका प्रा. सीमा शेटे-नवलाखे यांनी ‘अक्कमहादेवी- जिजाऊ -सावित्री यांचा वारसा आणि आजची स्त्री’ या विषयावर विचार व्यक्त करताना स्त्रियांच्या उज्वल इतिहासाला उजाळा दिला. समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशिमचे प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश लोध, संमेलनाचे स्वागताध्यक्ष काशिनाथआप्पा लाहोरे, दीपकआप्पा गाडे, किशोरआप्पा पेंढारकर, विश्वंबरआप्पा महाजन, अध्यक्ष बसव विचार केंद्र वाशिम, संजय आप्पा खेलुरकर यांची उपस्थिती होती. समारोपिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु जुबरे तर आभार वचन अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सचितानंद बिचेवार यांनी मानले. बसव साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेकरिता सर्व आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिम