शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

अडाण नदीच्या पुलावर साचले पाणी; अपघाताची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 16:28 IST

Washim News : अडाण नदीच्या पुलावर साचले पाणी; अपघाताची भिती

इंझोरी (वाशिम ): पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्या बुजल्यामुळे अडाण नदीच्या पुलावर पाणी साचले असून, वाहनचालकांना अडचणी येत असल्याने येथे अपघाताची भिती निर्माण झाली आहे.

कारंजा-मानोरा मार्गादरम्यान वाहणाऱ्या अडाण नदीवर सुरळीत वाहतुकीसाठी जवळपास ४५ वर्षांपूर्वी भव्य पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. हा पूल ४० फूट उंच आणि जवळपास १०० मीटर लांब आहे.शनिवारी इंझोरी परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार बरसला. यामुळे सर्वत्र पावसाचे पाणी साचले. यामधे कारंजा ते मानोरा मार्गावर असणाऱ्या अडाण नदीवरील पुलावर गूडघाभर पाणी साचले. याच पाण्यामधून शेकडो वाहनचालकांना मार्गक्रमण करत आपली वाहने काढण्याची कसरत करावी लागली. यामधे अपघाताची भिती दिसत होती. या सर्व बाबीकडे सा. बा. विभागाचे मात्र दुर्लक्षित धोरण दिसत आहे. कारण या १०० मीटर लांब पुलावर मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी टाकलेल्या केबल लाइनमुळे पुलावर आधीपासून असलेल्या नाल्या संपूर्णपणे बंद झाल्या. परिणामी, या पुलावर पावसाचे जमा झालेले पाणी वाहनार कोठून? असा प्रश्न निर्माण झाला.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस