शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अतीटंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्यांवर प्रशासनाचा विशेष ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:56 IST

शासनाने टँकरच्या फेऱ्यांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली असून अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याकरिता टँकर सुरू करण्यात आले आहेत; मात्र ते बहुतांश गावांमध्ये पोहचतच नसल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केली. त्याची दखल घेऊन प्रशासनाने टँकरच्या फेºयांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस उणापूरा ४ ते ५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. शंभरावर धरणे कोरडी पडली असून विहिरी, हातपंप, कुपनलिका, गावतलाव आदी जलस्त्रोतांच्या पाणीपातळीनेही तळ गाठला आहे. दरम्यान, उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने प्राप्त झालेले मागण्यांचे प्रस्ताव निकाली काढत विहिर अधिग्रहण, विशेष नळ दुरूस्ती यासह काही अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, बहुतांश गावांमध्ये टँकरच्या फेºयाच होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केले. काही टँकरवर असलेली जीपीएस यंत्रणा अकार्यक्षम ठरत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत सर्वप्रथम सर्व टँकरचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करून टँकरच्या नियमित कोणत्या गावात किती फेºया होतात, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे सुरू असून यात गावांची संख्या आणखी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई