शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

अतीटंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्यांवर प्रशासनाचा विशेष ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:56 IST

शासनाने टँकरच्या फेऱ्यांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली असून अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याकरिता टँकर सुरू करण्यात आले आहेत; मात्र ते बहुतांश गावांमध्ये पोहचतच नसल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केली. त्याची दखल घेऊन प्रशासनाने टँकरच्या फेºयांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस उणापूरा ४ ते ५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. शंभरावर धरणे कोरडी पडली असून विहिरी, हातपंप, कुपनलिका, गावतलाव आदी जलस्त्रोतांच्या पाणीपातळीनेही तळ गाठला आहे. दरम्यान, उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने प्राप्त झालेले मागण्यांचे प्रस्ताव निकाली काढत विहिर अधिग्रहण, विशेष नळ दुरूस्ती यासह काही अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, बहुतांश गावांमध्ये टँकरच्या फेºयाच होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केले. काही टँकरवर असलेली जीपीएस यंत्रणा अकार्यक्षम ठरत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत सर्वप्रथम सर्व टँकरचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करून टँकरच्या नियमित कोणत्या गावात किती फेºया होतात, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे सुरू असून यात गावांची संख्या आणखी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई