शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

अतीटंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्यांवर प्रशासनाचा विशेष ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:56 IST

शासनाने टँकरच्या फेऱ्यांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली असून अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याकरिता टँकर सुरू करण्यात आले आहेत; मात्र ते बहुतांश गावांमध्ये पोहचतच नसल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केली. त्याची दखल घेऊन प्रशासनाने टँकरच्या फेºयांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस उणापूरा ४ ते ५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. शंभरावर धरणे कोरडी पडली असून विहिरी, हातपंप, कुपनलिका, गावतलाव आदी जलस्त्रोतांच्या पाणीपातळीनेही तळ गाठला आहे. दरम्यान, उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने प्राप्त झालेले मागण्यांचे प्रस्ताव निकाली काढत विहिर अधिग्रहण, विशेष नळ दुरूस्ती यासह काही अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, बहुतांश गावांमध्ये टँकरच्या फेºयाच होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केले. काही टँकरवर असलेली जीपीएस यंत्रणा अकार्यक्षम ठरत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत सर्वप्रथम सर्व टँकरचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करून टँकरच्या नियमित कोणत्या गावात किती फेºया होतात, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे सुरू असून यात गावांची संख्या आणखी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई