शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:47 IST

वाशिम : केंद्र सरकारकडून नीती आयोगामार्फत देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देबुधवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र सरकारकडून नीती आयोगामार्फत देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील कृषि, आरोग्य, शिक्षण क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठीही विशेष प्रयत्न करणे आवश्यक असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणा-या विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.यावेळ वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह  अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले, वाशिम जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कृषि क्षेत्राचा विकासाला प्राधान्य देणे आवश्यक  आहे. याकरिता मृद आरोग्याचा (सॉईल हेल्थ) शास्त्रीय अभ्यास करून क्लस्टर स्वरुपात कोणत्या योजना राबविणे शक्य आहे, याविषयी एकत्रित विकास आराखडा तयार करा. तसेच कृषि यांत्रिकीकरणासाठी विशेष प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी कृषि विभागाला केल्या. तसेच जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी लवकरच जिल्ह्यात स्वतंत्र आढावा बैठक घेणार असल्याचेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.वाशिम येथे नाविण्यपूर्ण योजनेतून पर्यटनाला गती देण्यासाठी प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्क व मोनोरेल उभारणीच्या कामाचे  मुनगंटीवार यांनी यावेळी कौतुक केले.गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजसमधून पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधी आवश्यक आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्यास वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी मुनगंटीवार यांनी निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.लोणी तीर्थक्षेत्र येथील श्री संत सखाराम महाराज देवस्थान येथे सुरु असलेल्या विकास कामांचाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच ही सर्व कामे मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.वाशिम हा नवीन जिल्हा असून याठिकाणी शासकीय अधिकारी, कर्मचाºयांसाठी पुरेशी निवासस्थाने नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी सांगितले व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. यावेळी मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच याकरिता आवश्यक असलेला ८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले.प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ अंतर्गत झालेला खर्च, सन २०१८-१९ करिता प्रस्तावित नियतव्यय याची माहिती दिली. तसेच विविध यंत्रणांकडून ३०८ कोटी ७३ लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी असून सदर निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनीही जिल्हा परिषदेमार्फत जलसंधारण व जनसुविधा निर्मितीच्या कामांसाठी आवश्यक अतिरिक्त निधीच्या मागणीबाबत सादरीकरण केले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारwashimवाशिमAmravatiअमरावती