शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

खरीप हंगामात जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. त्यानुसार, गतवर्षीच्या हंगामातही ...

खरीप हंगामात जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. त्यानुसार, गतवर्षीच्या हंगामातही लाखो क्विंटल उत्पादन झाले, मात्र सुरुवातीला अल्प दर मिळाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर कालांतराने तब्बल ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सोयाबीनचे दर पोहोचले. शेतकऱ्यांकडे सोयाबीनच शिल्लक नसल्याने या दरवाढीचा त्यांना फायदा झाला नाही. स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रारंभी काही प्रमाणात सोयाबीन खरेदी करून ठेवल्याने त्यांचा थोडाफार फायदा झाला, तर काही मोठ्या शेतकऱ्यांनाही दरवाढीचा लाभ मिळाला. सध्या मात्र सोयाबीनचे दर घसरू लागले आहेत. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, मानोरा बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी सोयाबीनला सरासरी ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याचे दिसून आले.

...................

कोट :

सोयाबीनची दरवाढ होण्यापूर्वीच मालाची विक्री केली होती. त्यामुळे विशेष फायदा झाला नाही. आता लवकरच सोयाबीनचा नवा माल विक्रीसाठी येणार आहे; मात्र आतापासूनच दर कमी होत आहेत. ते यापुढे अधिकच घसरण्याची शक्यता असून यंदाही जेमतेम दरानेच सोयाबीन विक्री करावे लागणार आहे.

- प्रदीप इढोळे

.........

या वर्षी चांगले पर्जन्यमान व अनुकूल वातावरणामुळे सोयाबीनपासून विक्रमी उत्पादन हाती पडण्याची शक्यता आहे. असे असताना आतापासून सोयाबीनचे दर घसरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विशेष फायदा होणार नसल्याची एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे.

- अतुल कुटे