शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंंगाची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 19:40 IST

पिकाच्या शेंगा आता गळून पडत असल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीची मालिकाच सुरू आहे. आधीच आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे सोयाबीनचे पीक संकटात असताना आता गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वºहाडात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे या पिकाच्या शेंगा आता गळून पडत असल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम आणि अकोला या तिन्ही जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच आहे. याच पिकावर शेतकºयांचे अर्थचक्र सर्वाधिक अवलंबून असते. यंदा या तीन जिल्ह्यांत मिळून ८ लाख ८५ हजार २४५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात यंदाच्या खरीप हंगामात या पिकावर संकटांची मालिकाच सुरू आहे. त्याचा प्रत्यय पेरणीपासूनच येत आहे. राज्यात यंदा निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका शेतकºयांना बसला. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसाचा खंड, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण आणि त्यामुळे वाढलेला किडींचा प्रादूर्भाव आदि आपत्तींनी शेतकरी पुरता बेजार झाला. त्यात आॅगस्ट महिन्यात सतत १५ दिवस पावसाने झड लावली होती. त्यामुळे पाणी शेतात साचून राहिल्याने सोयाबीन पिकावर बुरशी रोगाचा प्रादूर्भाव होऊन ते पिवळे पडले. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पश्चिम वºहाडात पावसाने जणू ठाण मांडले आहे. काही भागांत जोरदार पाऊस पडत असल्याने सोयाबीनच्या शेंगा गळून पडत आहेत. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठी घट येणार असून, त्यावर कोणता उपायच नसल्याने ही घट टाळणे अशक्यच असून, सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे दिसत आहे. निम्म्याहून अधिक क्षेत्र सोयाबीनचीच पेरणीपश्चिम वºहाडात यंदा १५ लाख ६७ हजार २७८ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ८ लाख ८५ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचीच पेरणी आहे. अर्थात पश्चिम वºहाडातील एकूण खरीप क्षेत्रापैकी ५६ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात केवळ सोयाबीन पीक आहे. अर्थात या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत. हेच पीक नैसर्गिक आपत्तींनी संकटात सापडल्याने शेतकºयांचे अर्थचक्र विस्कळीत होणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती