शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंंगाची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 19:40 IST

पिकाच्या शेंगा आता गळून पडत असल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीची मालिकाच सुरू आहे. आधीच आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे सोयाबीनचे पीक संकटात असताना आता गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वºहाडात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे या पिकाच्या शेंगा आता गळून पडत असल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम आणि अकोला या तिन्ही जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच आहे. याच पिकावर शेतकºयांचे अर्थचक्र सर्वाधिक अवलंबून असते. यंदा या तीन जिल्ह्यांत मिळून ८ लाख ८५ हजार २४५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात यंदाच्या खरीप हंगामात या पिकावर संकटांची मालिकाच सुरू आहे. त्याचा प्रत्यय पेरणीपासूनच येत आहे. राज्यात यंदा निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका शेतकºयांना बसला. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसाचा खंड, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण आणि त्यामुळे वाढलेला किडींचा प्रादूर्भाव आदि आपत्तींनी शेतकरी पुरता बेजार झाला. त्यात आॅगस्ट महिन्यात सतत १५ दिवस पावसाने झड लावली होती. त्यामुळे पाणी शेतात साचून राहिल्याने सोयाबीन पिकावर बुरशी रोगाचा प्रादूर्भाव होऊन ते पिवळे पडले. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पश्चिम वºहाडात पावसाने जणू ठाण मांडले आहे. काही भागांत जोरदार पाऊस पडत असल्याने सोयाबीनच्या शेंगा गळून पडत आहेत. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठी घट येणार असून, त्यावर कोणता उपायच नसल्याने ही घट टाळणे अशक्यच असून, सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे दिसत आहे. निम्म्याहून अधिक क्षेत्र सोयाबीनचीच पेरणीपश्चिम वºहाडात यंदा १५ लाख ६७ हजार २७८ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ८ लाख ८५ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचीच पेरणी आहे. अर्थात पश्चिम वºहाडातील एकूण खरीप क्षेत्रापैकी ५६ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात केवळ सोयाबीन पीक आहे. अर्थात या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत. हेच पीक नैसर्गिक आपत्तींनी संकटात सापडल्याने शेतकºयांचे अर्थचक्र विस्कळीत होणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती