शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे; शेतकरी चिंतातूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:08 IST

सोयाबीन पिक पिवळे पडले असून, मुगाचेही नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मागील १४ दिवसात जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सतत पाऊस झाला. यामुळे सोयाबीन पिक पिवळे पडले असून, मुगाचेही नुकसान झाले. सोयाबीन पिक पिवळे पडल्याने उत्पादनात घट तर येणार नाही ना? अशी भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाने यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्याने शेती मशागतीची कामे पूर्ववत होत असल्याचे दिसून येते. पाणंद रस्त्यांवर चिखल झाल्याने गैरसोय होत आहे.यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यापासूनच बºयापैकी पाऊस पडत आहे. जिल्ह्यात तीन लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. आॅगस्ट महिन्यात ९ ते २० या दरम्यान संततधार पाऊस झाल्याने याचा सर्वाधिक फटका मूग पिकाला बसला. शेतातच शेंगा फुटत असल्याने उत्पादनात प्रचंड घट येण्याची भीती शेतकºयांनी वर्तविली. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिक पिवळे पडत आहे. सोयाबीन पिक पिवळे पडणे हा आजार तर नाही ना? याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणीही शेतकºयांमधून होत आहे. नदी, नाल्याकाठच्या शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ‘अतिवृष्टी’ नसल्याचे कारण समोर करून संबंधित यंत्रणेने अद्याप पिकांचे पंचनामे केले नाहीत.

शेती मशागतीची कामे पूर्ववतमागील १४ ते १५ दिवस सतत पाऊस असल्याने शेती मशागतीची कामे प्रभावित झाली होती. २१ आॅगस्टपासून पावसाने उघडीप दिल्याने किटकनाशक फवारणी, मूग सोंगणी यासह अन्य शेतीविषयक कामे पूर्ववत होत आहेत. पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतात जाताना शेतकºयांची दमछाक होत आहे. पाणंद रस्त्यांचे खडीकरण, मजबूतीकरण करण्याची मागणी वेळावेळी करण्यात आली. परंतू, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नसल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस