शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने बीजवाई कांदा, टोमॅटो, मूग, पपई भुईसपाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 11:01 IST

Sowing onion, tomato, green gram, papaya hit by hail हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्याच्या विविध भागात साेसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे शेकडो एकरावरील बीजवाई कांदा, मूग, पपई, टरबूज, आंबा या पिकांचे अताेनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. गतवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात सोंगून ठेवलेल्या व काही ठिकाणी काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशातच १९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक मेघ भरून येत ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. यादरम्यान, ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने सोसाट्याचा वारा सुटला व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सर्वच तालुक्यांमधील शेकडो एकरावर बहरलेला बीजवाई कांदा क्षणात भुईसपाट झाला. यासह उन्हाळी मूग, पपई, टरबूज, आंबा व अन्य फळपिके, भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले असून महसूल व कृषी विभागाने नुकसानाचे तत्काळ सर्वेक्षण करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विशेषत: उन्हाळी मूग, पपई, आंबा, टरबूज, भाजीपाला पिके व बीजवाई कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने सर्वेक्षण व नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. - शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीटagricultureशेती