शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

ग्रामीण भागातील समस्यांचे ‘आॅन दि स्पॉट’ निराकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:33 IST

वाशिम : वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मतदारांच्या गावात जावून जनता दरबार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत जनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. 

ठळक मुद्देजनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनता थेट आमनेसामने आल्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने निकाली निघत आहेत.

 वाशिम : वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मतदारांच्या गावात जावून जनता दरबार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत जनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनता थेट आमनेसामने आल्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने निकाली निघत आहेत. उकळीपेन येथील जनता दरबार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लखन मलिक होते. बाजार समितीचे मुख्य प्रशासक बंडू पाटील महाले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, धनंजय हेंद्रे, मोहन चौधरी, सरपंच खोडके, उपसरपंच गोवर्धन चव्हाण, शरद चव्हाण, तहसीलदार बळवंत अरखराव, गटविकास अधिकारी वाघ, महावितरणचे अधिक्षक अभियंता बेथारीया, उपअभियंता चव्हाण, कृषी अधिकारी देवगीरकर, अनसिंगचे ठाणेदार जाधव, गजानन हेंबाडे, उल्हास राठोड, बालासाहेब चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी घरकुल योजना, विहीर योजना, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना, अन्नसुरक्षा योजना, रेशनकार्ड समस्या, विद्युत पोल, स्मशान भूमी व्यवस्था, शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतकरी खरीप पीक कर्ज प्रकरणे, रस्ते, पुल व शिक्षण विभागाच्या एकुण १०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांचे तडकाफडकी निराकरण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार मलिक म्हणाले की, ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातंर्गत जनता दरबाराच्या माध्यमातून सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वंकष प्रयत्न करणार आहोत. उकळीपेन येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता सुरदुसे, संतोष चव्हाण, नारायण खोडके,  प्रल्हाद अंभोरे, मोहन गांजरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. जनता दरबाराचे फलीत!उकळीपेन येथे अनेक वर्षांपासून लाईनमन व तलाठी नव्हता. जनता दरबारामुळे अधिकारीवर्गाने तातडीने जनता दरबारातच तलाठी व लाईनमनची नियुक्ती केली. हे जनता दरबाराचे फलीतच म्हणावे लागेल. प्रथमच अशाप्रकारे जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवLakhan Malikलखन मलिक