शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

ग्रामीण भागातील समस्यांचे ‘आॅन दि स्पॉट’ निराकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:33 IST

वाशिम : वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मतदारांच्या गावात जावून जनता दरबार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत जनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. 

ठळक मुद्देजनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनता थेट आमनेसामने आल्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने निकाली निघत आहेत.

 वाशिम : वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मतदारांच्या गावात जावून जनता दरबार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत जनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनता थेट आमनेसामने आल्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने निकाली निघत आहेत. उकळीपेन येथील जनता दरबार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लखन मलिक होते. बाजार समितीचे मुख्य प्रशासक बंडू पाटील महाले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, धनंजय हेंद्रे, मोहन चौधरी, सरपंच खोडके, उपसरपंच गोवर्धन चव्हाण, शरद चव्हाण, तहसीलदार बळवंत अरखराव, गटविकास अधिकारी वाघ, महावितरणचे अधिक्षक अभियंता बेथारीया, उपअभियंता चव्हाण, कृषी अधिकारी देवगीरकर, अनसिंगचे ठाणेदार जाधव, गजानन हेंबाडे, उल्हास राठोड, बालासाहेब चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी घरकुल योजना, विहीर योजना, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना, अन्नसुरक्षा योजना, रेशनकार्ड समस्या, विद्युत पोल, स्मशान भूमी व्यवस्था, शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतकरी खरीप पीक कर्ज प्रकरणे, रस्ते, पुल व शिक्षण विभागाच्या एकुण १०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांचे तडकाफडकी निराकरण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार मलिक म्हणाले की, ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातंर्गत जनता दरबाराच्या माध्यमातून सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वंकष प्रयत्न करणार आहोत. उकळीपेन येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता सुरदुसे, संतोष चव्हाण, नारायण खोडके,  प्रल्हाद अंभोरे, मोहन गांजरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. जनता दरबाराचे फलीत!उकळीपेन येथे अनेक वर्षांपासून लाईनमन व तलाठी नव्हता. जनता दरबारामुळे अधिकारीवर्गाने तातडीने जनता दरबारातच तलाठी व लाईनमनची नियुक्ती केली. हे जनता दरबाराचे फलीतच म्हणावे लागेल. प्रथमच अशाप्रकारे जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवLakhan Malikलखन मलिक