शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

सौर कृषीपंपाच्या व्यर्थ ठरणाऱ्या वीजेचा होणार वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 14:25 IST

वर्षातील इतर ३०० दिवस हा सौर उर्जा संच उर्जानिर्मिती करीत असतानाही उपयोगात येत नाही.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांना सौर कृषीपंप योजनेंतर्गंत मिळालेल्या सौर पंपाचा वापर वर्षातील जेमतेम ६५ दिवस होतो. उर्वरित ३०० दिवस यातून निर्माण होणारी वीज मात्र वाया जाते. ही वीजही वापरता यावी आणि शेतकºयांना त्याचा फायदा व्हावा म्हणून जिल्ह्यातील वंदे गोमातरम शेतकरी बचत गटाने ही वीज संकलित करून महावितरणला वितरीत करण्याचा प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. त्यासाठी गट नोंदणीस कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, कृषी विभागाची त्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रक ल्प ठरणार आहे.शेतकºयांना आता पारंपरिक उर्जेची जोडणी देण्याऐवजी सौरउर्जा संच अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. ही प्रक्रिया कृषी विभाग व महावितरणच्या संयुक्त विद्यमाने पार पाडण्यात येते. शेतकºयांनी हे संच शेतात बसविल्यानंतर त्याचा रब्बी हंगामातील सिंचनासह इतर आवश्यक वेळेत होणारा वापर मिळून केवळ ६० ते ६५ दिवस वापर होतो. त्यामुळे वर्षातील इतर ३०० दिवस हा सौर उर्जा संच उर्जानिर्मिती करीत असतानाही उपयोगात येत नाही. दुसरीकडे महावितरणकडे सतत वीजेचा तुटवडा निर्माण होतो.ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे तथा शेती व्यवसायात सक्र ीय असलेले वाशिम येथील रवि मारशेटवार यांनी सौर उर्जा प्रकल्पातील वीज संकलित करून ती महावितरणला वितरीत करण्याचा प्रकल्प उभारण्याची संकल्पना केली आहे. या अंतर्गत वाशिम तालुक्यातील फाळेगाव थेट आणि खरोळा या दोन गावातील मिळून ९७ शेतकºयांच्या सौरपंपात निर्माण होणारी वीज केबलच्या माध्यमातून महावितरणच्या उपकेंद्राला दिली जाणार आहे. यासाठी एका शेतात एका खोलीचे बांधकाम करून त्यात प्रत्येक शेतकºयाच्या नावे वीज मीटर बसविले जाणार आहे. यावर सर्व संबंधित शेतकºयांची नावेही राहणार आहेत.सौरपंपात तयार झालेली सौर उर्जा किती याचा अंदाज या मीटरवरून येणार आहे. या खोलीतील सर्व मीटरची जोडणी उपकेंद्राच्या एका केबलवर करून तयार झालेली वीज उपकेंद्राकडे प्रवाहित केली जाईल.

शेतकºयांना महिन्याकाठी सहा हजारांवर उत्पन्नशेतातील सौरउर्जेच्या पंपाचा वापर झाल्यानंतर जी शिल्लक वीज निर्माण होते. ही महावितरणला वितरीत केल्यानंतर सर्व संबंधित शेतकºयांना महिन्याकाळी किमान सहा हजार ते कमाल दहा हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. अर्थात या प्रकल्पामुळे सौरउर्जेचा वापर योग्यपद्धतीने होईलच शिवाय शेतकºयांना त्यापासून अतिरिक्त लाभही मिळू शकणार आहे. प्रत्येक शेतकºयाच्या शेतात त्याच्या वापरानंतर निर्माण होणाºया अतिरिक्त वीजेचा परिमाणानुसार मोबदला मिळणार आहे.

वीज तुटवड्यावर उपयुक्त पर्यायराज्यात जलउर्जा आणि औष्णिक उर्जानिर्मितीवर सतत मर्यादा येत आहेत. यामुळे वीजेचा प्रचंड तुटवडा निर्माण होत असून, त्यामुळेच पर्याय म्हणून अपारंपरिक उर्जेचा वापर करण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. यासाठी ठिकठिकाणी शेकडो, हजारो कोटी रुपये खर्चून सौरउर्जा प्रकल्पही उभारण्यात येत आहेत. अशात वाशिम तालुक्यातील गीर वंदे गोमातरम शेतकरी गटाच्या प्रकल्पामुळे वीज बचतीला एक नवी दिशा आणि पर्याय मिळणार असून, यामुळे महावितरणच्या तुटवड्यावर नियंत्रण मिळू शकणार आहे.

वाशिम येथील वंदे गोमातरम शेतकरी गटाने सौर कृषीपंपाची वीज व्यर्थ जाऊ नये म्हणून जो प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. त्याचा फायदा शेतकºयांसह महावितरणला आणि पर्यायाने शासनालाही होणार आहे. या प्रकल्प उभारणीसाठी बचत गटाच्या नोंदणीस कृषी विभागाने परवानगीही दिली आहे. आता या प्रकल्पाला मूर्त रुप मिळावे म्हणून महावितरणकडे प्रस्ताव देऊन करार करण्यात येणार आहे. भविष्यातील वीज वापराचा विचार करून महावितरणने कोणतेही आढेवेढे न घेता या उपयुक्त प्रकल्पाच्या कराराला मंजुरी द्यावी.- रवि मारशेटवारशेतकरी तथा सदस्य, वंदे गो मातरम शेतकरी गट, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती