शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषीपंपाच्या व्यर्थ ठरणाऱ्या वीजेचा होणार वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 14:25 IST

वर्षातील इतर ३०० दिवस हा सौर उर्जा संच उर्जानिर्मिती करीत असतानाही उपयोगात येत नाही.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांना सौर कृषीपंप योजनेंतर्गंत मिळालेल्या सौर पंपाचा वापर वर्षातील जेमतेम ६५ दिवस होतो. उर्वरित ३०० दिवस यातून निर्माण होणारी वीज मात्र वाया जाते. ही वीजही वापरता यावी आणि शेतकºयांना त्याचा फायदा व्हावा म्हणून जिल्ह्यातील वंदे गोमातरम शेतकरी बचत गटाने ही वीज संकलित करून महावितरणला वितरीत करण्याचा प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. त्यासाठी गट नोंदणीस कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, कृषी विभागाची त्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रक ल्प ठरणार आहे.शेतकºयांना आता पारंपरिक उर्जेची जोडणी देण्याऐवजी सौरउर्जा संच अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. ही प्रक्रिया कृषी विभाग व महावितरणच्या संयुक्त विद्यमाने पार पाडण्यात येते. शेतकºयांनी हे संच शेतात बसविल्यानंतर त्याचा रब्बी हंगामातील सिंचनासह इतर आवश्यक वेळेत होणारा वापर मिळून केवळ ६० ते ६५ दिवस वापर होतो. त्यामुळे वर्षातील इतर ३०० दिवस हा सौर उर्जा संच उर्जानिर्मिती करीत असतानाही उपयोगात येत नाही. दुसरीकडे महावितरणकडे सतत वीजेचा तुटवडा निर्माण होतो.ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे तथा शेती व्यवसायात सक्र ीय असलेले वाशिम येथील रवि मारशेटवार यांनी सौर उर्जा प्रकल्पातील वीज संकलित करून ती महावितरणला वितरीत करण्याचा प्रकल्प उभारण्याची संकल्पना केली आहे. या अंतर्गत वाशिम तालुक्यातील फाळेगाव थेट आणि खरोळा या दोन गावातील मिळून ९७ शेतकºयांच्या सौरपंपात निर्माण होणारी वीज केबलच्या माध्यमातून महावितरणच्या उपकेंद्राला दिली जाणार आहे. यासाठी एका शेतात एका खोलीचे बांधकाम करून त्यात प्रत्येक शेतकºयाच्या नावे वीज मीटर बसविले जाणार आहे. यावर सर्व संबंधित शेतकºयांची नावेही राहणार आहेत.सौरपंपात तयार झालेली सौर उर्जा किती याचा अंदाज या मीटरवरून येणार आहे. या खोलीतील सर्व मीटरची जोडणी उपकेंद्राच्या एका केबलवर करून तयार झालेली वीज उपकेंद्राकडे प्रवाहित केली जाईल.

शेतकºयांना महिन्याकाठी सहा हजारांवर उत्पन्नशेतातील सौरउर्जेच्या पंपाचा वापर झाल्यानंतर जी शिल्लक वीज निर्माण होते. ही महावितरणला वितरीत केल्यानंतर सर्व संबंधित शेतकºयांना महिन्याकाळी किमान सहा हजार ते कमाल दहा हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. अर्थात या प्रकल्पामुळे सौरउर्जेचा वापर योग्यपद्धतीने होईलच शिवाय शेतकºयांना त्यापासून अतिरिक्त लाभही मिळू शकणार आहे. प्रत्येक शेतकºयाच्या शेतात त्याच्या वापरानंतर निर्माण होणाºया अतिरिक्त वीजेचा परिमाणानुसार मोबदला मिळणार आहे.

वीज तुटवड्यावर उपयुक्त पर्यायराज्यात जलउर्जा आणि औष्णिक उर्जानिर्मितीवर सतत मर्यादा येत आहेत. यामुळे वीजेचा प्रचंड तुटवडा निर्माण होत असून, त्यामुळेच पर्याय म्हणून अपारंपरिक उर्जेचा वापर करण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. यासाठी ठिकठिकाणी शेकडो, हजारो कोटी रुपये खर्चून सौरउर्जा प्रकल्पही उभारण्यात येत आहेत. अशात वाशिम तालुक्यातील गीर वंदे गोमातरम शेतकरी गटाच्या प्रकल्पामुळे वीज बचतीला एक नवी दिशा आणि पर्याय मिळणार असून, यामुळे महावितरणच्या तुटवड्यावर नियंत्रण मिळू शकणार आहे.

वाशिम येथील वंदे गोमातरम शेतकरी गटाने सौर कृषीपंपाची वीज व्यर्थ जाऊ नये म्हणून जो प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. त्याचा फायदा शेतकºयांसह महावितरणला आणि पर्यायाने शासनालाही होणार आहे. या प्रकल्प उभारणीसाठी बचत गटाच्या नोंदणीस कृषी विभागाने परवानगीही दिली आहे. आता या प्रकल्पाला मूर्त रुप मिळावे म्हणून महावितरणकडे प्रस्ताव देऊन करार करण्यात येणार आहे. भविष्यातील वीज वापराचा विचार करून महावितरणने कोणतेही आढेवेढे न घेता या उपयुक्त प्रकल्पाच्या कराराला मंजुरी द्यावी.- रवि मारशेटवारशेतकरी तथा सदस्य, वंदे गो मातरम शेतकरी गट, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती