शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

सहा हजार अर्जांची आज छाननी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:20 IST

वाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४0६ आणि सदस्य पदांकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, यामध्ये किती आणि कुणाचे अर्ज बाद होतात, याकडे इच्छुकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूकअधिक अपत्य असताना भरल्या गेले उमेदवारी अर्जप्रशासन म्हणते, आक्षेप आवश्यक!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४0६ आणि सदस्य पदांकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, यामध्ये किती आणि कुणाचे अर्ज बाद होतात, याकडे इच्छुकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणुकीकरिता १५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार, जिल्हाभरातून सरपंच पदासाठी १४0६ आणि सदस्य पदासाठी ४७५७, असे एकूण ६१६३ अर्ज प्राप्त झाले. या सर्व अर्जांची छाननी २५ सप्टेंबर रोजी त्या-त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात होणार असून, या प्रक्रियेत प्रत्यक्ष किती अर्ज त्रुटींमध्ये अथवा इतर कारणांवरून बाद होतात, याकडे इच्छुक उमेदवारांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 

अधिक अपत्य असताना भरल्या गेले उमेदवारी अर्ज; प्रशासन म्हणते, आक्षेप आवश्यक!ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमाच्या तरतुदीनुसार १२ सप्टेंबर २00१ नंतर तिसरे अपत्य जन्माला आल्यास संबंधित व्यक्ती निवडणूक लढण्यास अपात्र ठरतो. असे असताना जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींमधून अनेक इच्छुकांनी खोटे हमीपत्र सादर करून निवडणुकीत उडी घेतली आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील कोरडे यांना छेडले असता, अधिनियम तरतुदीचा भंग करणार्‍या संबंधित उमेदवाराविरूद्ध लेखी आक्षेप सादर करून त्याबाबतचे पुरावे दिल्याशिवाय कुठलीच कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र गावपातळीवरील राजकारणात प्रतिस्पर्धींविरूद्ध उघडपणे आक्षेप घेतल्यास नाहक वाद उपस्थित होऊ शकतात. यायोगे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळेच माहिती असूनही कुणी तक्रार करण्यास अथवा आक्षेप घेण्यास धजावत नसल्याचे एकंदरित चित्र आहे. निवडणूक अधिनियमाच्या तरतुदीनुसार शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर करतील, अशा व्यक्तीदेखील निवडणूक लढण्यास अपात्र ठरतात. या बाबीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी थेट ग्रामसेवकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर शौचालय उभारणीच्या कामास गती आली. मात्र, अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात शौचालयांबाबतही चुकीचे हमीपत्र सादर केले जाण्याची शक्यता असल्याने याकडे प्रशासनाला विशेष लक्ष पुरवावे लागणार असल्याचा सूर सर्वसामान्य मतदारांमधून उमटत आहे. -