शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

सहा हजार अर्जांची आज छाननी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:20 IST

वाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४0६ आणि सदस्य पदांकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, यामध्ये किती आणि कुणाचे अर्ज बाद होतात, याकडे इच्छुकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूकअधिक अपत्य असताना भरल्या गेले उमेदवारी अर्जप्रशासन म्हणते, आक्षेप आवश्यक!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४0६ आणि सदस्य पदांकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, यामध्ये किती आणि कुणाचे अर्ज बाद होतात, याकडे इच्छुकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणुकीकरिता १५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार, जिल्हाभरातून सरपंच पदासाठी १४0६ आणि सदस्य पदासाठी ४७५७, असे एकूण ६१६३ अर्ज प्राप्त झाले. या सर्व अर्जांची छाननी २५ सप्टेंबर रोजी त्या-त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात होणार असून, या प्रक्रियेत प्रत्यक्ष किती अर्ज त्रुटींमध्ये अथवा इतर कारणांवरून बाद होतात, याकडे इच्छुक उमेदवारांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 

अधिक अपत्य असताना भरल्या गेले उमेदवारी अर्ज; प्रशासन म्हणते, आक्षेप आवश्यक!ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमाच्या तरतुदीनुसार १२ सप्टेंबर २00१ नंतर तिसरे अपत्य जन्माला आल्यास संबंधित व्यक्ती निवडणूक लढण्यास अपात्र ठरतो. असे असताना जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींमधून अनेक इच्छुकांनी खोटे हमीपत्र सादर करून निवडणुकीत उडी घेतली आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील कोरडे यांना छेडले असता, अधिनियम तरतुदीचा भंग करणार्‍या संबंधित उमेदवाराविरूद्ध लेखी आक्षेप सादर करून त्याबाबतचे पुरावे दिल्याशिवाय कुठलीच कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र गावपातळीवरील राजकारणात प्रतिस्पर्धींविरूद्ध उघडपणे आक्षेप घेतल्यास नाहक वाद उपस्थित होऊ शकतात. यायोगे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळेच माहिती असूनही कुणी तक्रार करण्यास अथवा आक्षेप घेण्यास धजावत नसल्याचे एकंदरित चित्र आहे. निवडणूक अधिनियमाच्या तरतुदीनुसार शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर करतील, अशा व्यक्तीदेखील निवडणूक लढण्यास अपात्र ठरतात. या बाबीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी थेट ग्रामसेवकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर शौचालय उभारणीच्या कामास गती आली. मात्र, अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात शौचालयांबाबतही चुकीचे हमीपत्र सादर केले जाण्याची शक्यता असल्याने याकडे प्रशासनाला विशेष लक्ष पुरवावे लागणार असल्याचा सूर सर्वसामान्य मतदारांमधून उमटत आहे. -