शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार अर्जांची आज छाननी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:20 IST

वाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४0६ आणि सदस्य पदांकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, यामध्ये किती आणि कुणाचे अर्ज बाद होतात, याकडे इच्छुकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूकअधिक अपत्य असताना भरल्या गेले उमेदवारी अर्जप्रशासन म्हणते, आक्षेप आवश्यक!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४0६ आणि सदस्य पदांकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, यामध्ये किती आणि कुणाचे अर्ज बाद होतात, याकडे इच्छुकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणुकीकरिता १५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार, जिल्हाभरातून सरपंच पदासाठी १४0६ आणि सदस्य पदासाठी ४७५७, असे एकूण ६१६३ अर्ज प्राप्त झाले. या सर्व अर्जांची छाननी २५ सप्टेंबर रोजी त्या-त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात होणार असून, या प्रक्रियेत प्रत्यक्ष किती अर्ज त्रुटींमध्ये अथवा इतर कारणांवरून बाद होतात, याकडे इच्छुक उमेदवारांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 

अधिक अपत्य असताना भरल्या गेले उमेदवारी अर्ज; प्रशासन म्हणते, आक्षेप आवश्यक!ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमाच्या तरतुदीनुसार १२ सप्टेंबर २00१ नंतर तिसरे अपत्य जन्माला आल्यास संबंधित व्यक्ती निवडणूक लढण्यास अपात्र ठरतो. असे असताना जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींमधून अनेक इच्छुकांनी खोटे हमीपत्र सादर करून निवडणुकीत उडी घेतली आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील कोरडे यांना छेडले असता, अधिनियम तरतुदीचा भंग करणार्‍या संबंधित उमेदवाराविरूद्ध लेखी आक्षेप सादर करून त्याबाबतचे पुरावे दिल्याशिवाय कुठलीच कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र गावपातळीवरील राजकारणात प्रतिस्पर्धींविरूद्ध उघडपणे आक्षेप घेतल्यास नाहक वाद उपस्थित होऊ शकतात. यायोगे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळेच माहिती असूनही कुणी तक्रार करण्यास अथवा आक्षेप घेण्यास धजावत नसल्याचे एकंदरित चित्र आहे. निवडणूक अधिनियमाच्या तरतुदीनुसार शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर करतील, अशा व्यक्तीदेखील निवडणूक लढण्यास अपात्र ठरतात. या बाबीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी थेट ग्रामसेवकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर शौचालय उभारणीच्या कामास गती आली. मात्र, अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात शौचालयांबाबतही चुकीचे हमीपत्र सादर केले जाण्याची शक्यता असल्याने याकडे प्रशासनाला विशेष लक्ष पुरवावे लागणार असल्याचा सूर सर्वसामान्य मतदारांमधून उमटत आहे. -